शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

‘मेगा’ गोंधळामुळे ‘२८ बळी’

By admin | Updated: May 2, 2016 01:21 IST

१ मेला असणारा रेल्वेचा मेगा ब्लॉक व सेंटरच्या पत्त्यातील गोंधळामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) दिल्ली द्वारा रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रो. मेडिकल / प्रा-डेंटल

- पंकज राऊत,  बोईसर१ मेला असणारा रेल्वेचा मेगा ब्लॉक व सेंटरच्या पत्त्यातील गोंधळामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) दिल्ली द्वारा रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रो. मेडिकल / प्रा-डेंटल ए.आय.पी.एम.टी प्रवेश परीक्षेला राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या अठ्ठावीस विद्यार्थ्याना बोईसर येथील परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अवघे काही मिनिट उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांना हताश होऊन परतावे लागले.रविवारी एआयपीएमटी ही परीक्षा देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. त्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील फक्त मुंबई, नागपूर व ठाणे ही तीन परीक्षाकेंद्र होती. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी होती आणि परीक्षा केंद्रावर शेवटची एन्ट्रीची वेळ साडेनऊ वाजताची होती. परंतु आज रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे पर जिल्ह्यातून रेल्वेने आलेल्या विद्यार्थी साडेनऊ ऐवजी पावणे दहाच्या सुमारास परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर परीक्षेचे सेंटर पालघर जिल्ह्यात असून प्रोव्हीजोनल अ‍ॅडमीटकार्ड (हॉल तिकीट)वर पालघर जिल्ह्या ऐवजी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा ठाणे जिल्ह्यात सेंटर शोधण्यात वेळ वाया गेला.अखेरच्या क्षणी बहूसंख्य विद्यार्थी खाजगी कारने बोईसरला पोहोचले. परंतु औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, रायगड, अहमदनगर, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना ठाणे आणि पालघर या गोंधळामुळे त्यांच्या संभ्रम निर्माण होऊन सकाळचा वेळ वाया जाऊन त्यांना अखेर मुकावे लागले.चिन्मय विद्यालयातील प्रकारपालघर जिल्ह्यातील बोईसर येथील चिन्मया विद्यालयात घेण्यात आलेल्या परीक्षेला अवघे काही मिनिटे उशीरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी अत्यंत कळकळून विनंती करूनही त्यांना संधी दिली नाही.या घटनेचे वृत्त मनसेचे जिल्हा प्रमुख अरुण कदम, उपजिल्हा प्रमुख अनंत दळवी, तालुका प्रमुख समीर मोरे, पदाधिकारी शिवाजी टेंबाळकर, चेतन संखे इ. ना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आणि त्यांनी शाळा व्यवस्थापन व आॅब्जर्रर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शाळेच्या सुरक्षाबल व पोलिसांनी शाळेच्या प्रवेश द्वारावरच रोखून धरले तर झालेल्या प्रकाराबाबतची माहिती देण्यासही आॅब्जरांनी पत्रकारांना स्पष्ट नकार दिला.कुठलेही ठोस आश्वासन नाहीदुपारी एक वाजता परीक्षा संपल्यानंतर आॅब्जररांनी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या २८ विद्यार्थ्यांना विद्यालयात बोलावून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा परीक्षेला बसू देण्यासंदर्भात विनंती पत्र लिहून घेतले. मात्र कुठलेही ठोस आश्वासन न दिल्याने आणि वर्षभर अभ्यास करून परीक्षा न देता आल्याने विद्यार्थी व पालक निराश होऊन परतले. तर २४ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या नीट २ या परीक्षेला बसू दिले तर या विद्यार्थ्यांवर झालेला अन्या दूर होईल अन्यथा परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा दोष नसताना त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.