शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

२५० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:44 IST

या वर्षी देखील आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभरामुळे जिल्हयातील इमारत क्षमतेनुसार जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डहाणू प्रकल्पाने ठाणे येािील अप्पर आयुक्त

डहाणू : या वर्षी देखील आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभरामुळे जिल्हयातील इमारत क्षमतेनुसार जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डहाणू प्रकल्पाने ठाणे येािील अप्पर आयुक्त कार्यालय यांना एका पत्राव्दारे शिफारस केली होती. परंतु दोन महिने उलटले तरी मंजूरी मिळाली नव्हती. अखेरी या बाबतीत लोकमत ने आवाज उठविल्याने नुकतेच ठाणे येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी जिल्हयातील १७ वसतीगृहात २५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश डहाणू प्रकल्प कार्यालयाला दिल्याने येथील आदिवासी पालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील दुर्गम भागांतील आदिवासी विद्यार्थी विद्यार्थींनीना मुंबई, वसई, पालघर, डहाणू, बोर्डी तसेच इतर जिल्हयाच्या ठिकाणच्या महाविद्यालयात उच्चशिक्षण घेता यावे यासाठी शासनाने पालघर जिल्हयातील वरील ठिकाणी १७ निवासी वसतीगृह आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. परंतु दरवर्षी पास होणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट, तिप्पट झाली असतांना विद्यमान वसतीगृहाची संख्या व क्षमता तसेच शासनाच्या मालकीची इमारत होत नसल्याने दरवर्षी हजारो विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येत असते. या वर्षी ही निवासी वसतीगृह प्रवेशासाठी हजारो आदिवासी मुला, मुलींनी आॅनलाईन अर्ज केले होते. परंतु विद्यमान वसतीगृहाच्या क्षमतेनुसार केवळ १३८७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने ६६६ मुले, मुली वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहिले होते.दरम्यान, पालघर जिल्हयातील १७ वसतीगृहाची इमारत क्षमता १६२६ असल्याने डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयाने विद्यमान वसतीगृहात अद्याप ५० विद्यार्थी राहू शकतील अशी शिफारस ठाणे येथील आदिवासी अप्पर आयुक्तांना करून मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविले होते. परंतु दोन महिने झाले तरी त्या प्रस्तावाला मंजूरी न मिळाल्याने अखेर लोकमतने या बाबतीत आवाज उठवून आदिवासी विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याने खडबडून प्रशासन जागे झाले. अखेर आदिवासी अप्पर आयुक्तांनी २५० विद्यार्थी घेण्याचे आदेश काढल्याने जिल्हयातील १७ निवासी वसतीगृहत आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना डहाणू प्रकल्प कार्यालयाने प्रवेश देण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय थांबणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी