शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

२५० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:44 IST

या वर्षी देखील आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभरामुळे जिल्हयातील इमारत क्षमतेनुसार जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डहाणू प्रकल्पाने ठाणे येािील अप्पर आयुक्त

डहाणू : या वर्षी देखील आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभरामुळे जिल्हयातील इमारत क्षमतेनुसार जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डहाणू प्रकल्पाने ठाणे येािील अप्पर आयुक्त कार्यालय यांना एका पत्राव्दारे शिफारस केली होती. परंतु दोन महिने उलटले तरी मंजूरी मिळाली नव्हती. अखेरी या बाबतीत लोकमत ने आवाज उठविल्याने नुकतेच ठाणे येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी जिल्हयातील १७ वसतीगृहात २५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश डहाणू प्रकल्प कार्यालयाला दिल्याने येथील आदिवासी पालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील दुर्गम भागांतील आदिवासी विद्यार्थी विद्यार्थींनीना मुंबई, वसई, पालघर, डहाणू, बोर्डी तसेच इतर जिल्हयाच्या ठिकाणच्या महाविद्यालयात उच्चशिक्षण घेता यावे यासाठी शासनाने पालघर जिल्हयातील वरील ठिकाणी १७ निवासी वसतीगृह आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. परंतु दरवर्षी पास होणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट, तिप्पट झाली असतांना विद्यमान वसतीगृहाची संख्या व क्षमता तसेच शासनाच्या मालकीची इमारत होत नसल्याने दरवर्षी हजारो विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येत असते. या वर्षी ही निवासी वसतीगृह प्रवेशासाठी हजारो आदिवासी मुला, मुलींनी आॅनलाईन अर्ज केले होते. परंतु विद्यमान वसतीगृहाच्या क्षमतेनुसार केवळ १३८७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने ६६६ मुले, मुली वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहिले होते.दरम्यान, पालघर जिल्हयातील १७ वसतीगृहाची इमारत क्षमता १६२६ असल्याने डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयाने विद्यमान वसतीगृहात अद्याप ५० विद्यार्थी राहू शकतील अशी शिफारस ठाणे येथील आदिवासी अप्पर आयुक्तांना करून मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविले होते. परंतु दोन महिने झाले तरी त्या प्रस्तावाला मंजूरी न मिळाल्याने अखेर लोकमतने या बाबतीत आवाज उठवून आदिवासी विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याने खडबडून प्रशासन जागे झाले. अखेर आदिवासी अप्पर आयुक्तांनी २५० विद्यार्थी घेण्याचे आदेश काढल्याने जिल्हयातील १७ निवासी वसतीगृहत आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना डहाणू प्रकल्प कार्यालयाने प्रवेश देण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय थांबणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी