शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

गणेशोत्सवासाठी पालघर डेपोतून कोकणात २२२ जादा गाड्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:10 IST

गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.

- हितेन नाईक ।पालघर : गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व असून इतर कुठल्याही सणापेक्षा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काम, धंद्या निमित्ताने जगात कुठेही गेलेल्या कोकणवासीयाची पावले आपल्या गावाकडे वळत असतात. जिल्ह्यातील आठ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेला कोकणवासीय बांधव १३ सप्टेंबर रोजी गणेशाच्या आगमना आधीच गावा कडे जाणार असल्याने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान पालघर विभागाने ग्रुप आणि आरक्षण(रिझर्वेशन) साठी २२२ बसेस ची व्यवस्था ठेवली आहे.८ सप्टेंबर पासून वसई आगरातून १ आरक्षणाची व्यवस्था असलेली बस, अर्नाळा आगरातून १ बस तर नालासोपारा आगरातून २ अशा ४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.९ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १ ग्रुप, २ आरक्षण बसेस, अर्नाळा आगरातून १ ग्रुप ४ आरक्षण, नालासोपारा आगरातून ३ ग्रुप तर ७ आरक्षण, अशा ५ ग्रुप तर १३ आरक्षणाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.१० सप्टेंबर रोजी वसई आगरातून ५ ग्रुप तर २ आरक्षण, अर्नाळा मधून ५ ग्रुप, ४ आरक्षण, तर नालासोपारा मधून १५ ग्रुप तर ८ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.११ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १५ बसेस ग्रुप साठी तर ३ आरक्षणासाठी,अर्नाळ्यातून २३ ग्रुप तर ५आरक्षण,नालासोपाऱ्यातून ८५ ग्रुप तर ७ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.१२ सप्टेंबर रोजी वसई आगरातून २ ग्रुप तर ३ आरक्षण, अर्नाळा आगरातून ४ ग्रुप तर ३ आरक्षण, नालासोपारा आगरातून ७ ग्रुप,४ आरक्षण अशा बसेस सोडण्यात येणार आहेत. .ह्या चार दिवसात एकूण १६६ ग्रुप आणि ५६ आरक्षण बसेस पालघर विभाग सोडणार असून मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालघर विभाग सज्ज असल्याचे आशिष चौधरी ह्यांनी लोकमत ला सांगितले.रस्त्यावरील खड्ड्याची परिस्थिती प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही गंभीर असून गणपतीपूर्वी सर्व रस्त्यावरील खड्डे भरले जातील अशी आश्वासने शासनाने दिले आहे. मात्र ह्या आश्वासनावर अवलंबून न राहता कोकणात जाणाº्या प्रवाश्यांना प्रवासा दरम्यान कुठलाही त्रास अथवा असुविधा निर्माण होऊ नये म्हणून एसटी मंडळाने विशेष नियोजन केले आहे.प्रवासा दरम्यान एसटी नादुरुस्त झाल्यास पालघर ते ठाणे पर्यंत परिवहन विभागाकडून दुरुस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली असून पोलिसांच्या समन्वयाने तपासी पथके नेमण्यात आली आहेत. पुढे ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी हे विभाग आपल्या पद्धतीने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी तैनात राहणार आहेत.चालक-वाहकांच्या घरातही गणेशाचे आगमन होणार असल्याने त्यांची कमतरता भासू नये ह्यासाठी पालघर विभागाने ४९ चालक-वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केली आहे.>प्रवासी, कर्मचारी यांची पुरेपूर काळजीचालक व वाहकांची कमतरता भासू नये म्हणून १०० चालक- वाहकांची टेस्ट घेण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे.त्यांना अधिक ओव्हर टाईम मिळण्याच्या दृष्टीने ही प्रयोजन करण्यात आले आहे.या गाड्यांवर तैनात केले जाणारे चालक आणि वाहक निर्व्यसनी असतील तसेच या सेवेसाठी पुरविल्या जाणाºया गाड्या या सुव्यवस्थित असतील याबाबतची पूर्व दक्षता कटाक्षाने घेण्यात आलेली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी लोकमतला दिली.