शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गणेशोत्सवासाठी पालघर डेपोतून कोकणात २२२ जादा गाड्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:10 IST

गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.

- हितेन नाईक ।पालघर : गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे.कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व असून इतर कुठल्याही सणापेक्षा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काम, धंद्या निमित्ताने जगात कुठेही गेलेल्या कोकणवासीयाची पावले आपल्या गावाकडे वळत असतात. जिल्ह्यातील आठ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेला कोकणवासीय बांधव १३ सप्टेंबर रोजी गणेशाच्या आगमना आधीच गावा कडे जाणार असल्याने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान पालघर विभागाने ग्रुप आणि आरक्षण(रिझर्वेशन) साठी २२२ बसेस ची व्यवस्था ठेवली आहे.८ सप्टेंबर पासून वसई आगरातून १ आरक्षणाची व्यवस्था असलेली बस, अर्नाळा आगरातून १ बस तर नालासोपारा आगरातून २ अशा ४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.९ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १ ग्रुप, २ आरक्षण बसेस, अर्नाळा आगरातून १ ग्रुप ४ आरक्षण, नालासोपारा आगरातून ३ ग्रुप तर ७ आरक्षण, अशा ५ ग्रुप तर १३ आरक्षणाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.१० सप्टेंबर रोजी वसई आगरातून ५ ग्रुप तर २ आरक्षण, अर्नाळा मधून ५ ग्रुप, ४ आरक्षण, तर नालासोपारा मधून १५ ग्रुप तर ८ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.११ सप्टेंबर रोजी वसई आगरातून १५ बसेस ग्रुप साठी तर ३ आरक्षणासाठी,अर्नाळ्यातून २३ ग्रुप तर ५आरक्षण,नालासोपाऱ्यातून ८५ ग्रुप तर ७ आरक्षण बसेस सोडण्यात येणार आहेत.१२ सप्टेंबर रोजी वसई आगरातून २ ग्रुप तर ३ आरक्षण, अर्नाळा आगरातून ४ ग्रुप तर ३ आरक्षण, नालासोपारा आगरातून ७ ग्रुप,४ आरक्षण अशा बसेस सोडण्यात येणार आहेत. .ह्या चार दिवसात एकूण १६६ ग्रुप आणि ५६ आरक्षण बसेस पालघर विभाग सोडणार असून मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालघर विभाग सज्ज असल्याचे आशिष चौधरी ह्यांनी लोकमत ला सांगितले.रस्त्यावरील खड्ड्याची परिस्थिती प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही गंभीर असून गणपतीपूर्वी सर्व रस्त्यावरील खड्डे भरले जातील अशी आश्वासने शासनाने दिले आहे. मात्र ह्या आश्वासनावर अवलंबून न राहता कोकणात जाणाº्या प्रवाश्यांना प्रवासा दरम्यान कुठलाही त्रास अथवा असुविधा निर्माण होऊ नये म्हणून एसटी मंडळाने विशेष नियोजन केले आहे.प्रवासा दरम्यान एसटी नादुरुस्त झाल्यास पालघर ते ठाणे पर्यंत परिवहन विभागाकडून दुरुस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली असून पोलिसांच्या समन्वयाने तपासी पथके नेमण्यात आली आहेत. पुढे ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी हे विभाग आपल्या पद्धतीने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी तैनात राहणार आहेत.चालक-वाहकांच्या घरातही गणेशाचे आगमन होणार असल्याने त्यांची कमतरता भासू नये ह्यासाठी पालघर विभागाने ४९ चालक-वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केली आहे.>प्रवासी, कर्मचारी यांची पुरेपूर काळजीचालक व वाहकांची कमतरता भासू नये म्हणून १०० चालक- वाहकांची टेस्ट घेण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे.त्यांना अधिक ओव्हर टाईम मिळण्याच्या दृष्टीने ही प्रयोजन करण्यात आले आहे.या गाड्यांवर तैनात केले जाणारे चालक आणि वाहक निर्व्यसनी असतील तसेच या सेवेसाठी पुरविल्या जाणाºया गाड्या या सुव्यवस्थित असतील याबाबतची पूर्व दक्षता कटाक्षाने घेण्यात आलेली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी लोकमतला दिली.