शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

२२ कंत्राटी कनिष्ठ अभियंते पुन्हा सेवेत, तत्कालीन आयुक्तांनी बसवले होते घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:54 IST

वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते.

वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या २२ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका प्रशासनाने आॅक्टोबर २०१९ मध्ये ऐन दिवाळी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांनी घरचा रस्ता दाखवून सेवामुक्त केले होते. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ माजली होती.ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याने त्या वेळेस काहीही हालचाल झाली नव्हती. धक्कादायक म्हणजे कुणाच्या तरी तक्रारीवरून आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता, अशी मधल्या काळात महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या मुद्यावरून टीका करताना महापालिका व बविआ नेत्यांना घरचा आहेर दिला होता. मुळातच या २२ कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून काढताना कुठलीही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नव्हती. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात या अभियंत्यांनी बविआचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली होती. या प्रकरणात न्याय कृती करण्याचे आश्वासन आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्या वेळी दिले होते.महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाला जाब विचारला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याची तयारीही त्यांनी केली होती. प्रशासनाने सेवा खंडित केलेल्या त्या २२ कनिष्ठ अभियंत्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचा शब्द दिल्याने या प्रकरणाची महासभेत चर्चा झाली नाही.चार महिने बेरोजगारमागील चार महिने बेरोजगार असलेले हे अभियंते महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.अखेर या पाठपुराव्याला यश आले असून २० जानेवारीपासून या सर्वांना त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार