शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2022 13:15 IST

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते.

- हितेन नाईक

पालघर : राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास आता शासन आपल्या मदतीसाठी धावणार आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसाहाय्य देण्यात येते.

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते. सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरला असून, दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.

५० पैकी ७ प्रस्ताव मंजूरगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनंतर्गत २०२०-२१ मध्ये आठ तालुक्यांतील ५० प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले. त्यातील ७ प्रस्ताव मंजूर झाले. कंपनीकडे २९ प्रलंबित असून, दोन प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांमुळे रद्द झाले आहेत, तर त्रुटी प्रलंबित १२ प्रस्ताव पडून आहेत.

दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाखअपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

एक अवयव गेल्यास एक लाखशेतीची कामे करताना अपघात झाल्यास अथवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखएखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची नुकसानभरपाई देण्यात येते.

मदतीसाठी अर्ज कोठे कराल?एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल, तसेच दावा अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील. अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाने ४५ दिवसांच्या आत योग्य कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपला प्रस्ताव दाखल करावा.     - जिल्हा कृषी अधीक्षक, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार