शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2022 13:15 IST

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते.

- हितेन नाईक

पालघर : राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास आता शासन आपल्या मदतीसाठी धावणार आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसाहाय्य देण्यात येते.

शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते, म्हणून अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य देण्यात येते. सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरला असून, दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवितात.

५० पैकी ७ प्रस्ताव मंजूरगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनंतर्गत २०२०-२१ मध्ये आठ तालुक्यांतील ५० प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले. त्यातील ७ प्रस्ताव मंजूर झाले. कंपनीकडे २९ प्रलंबित असून, दोन प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांमुळे रद्द झाले आहेत, तर त्रुटी प्रलंबित १२ प्रस्ताव पडून आहेत.

दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाखअपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

एक अवयव गेल्यास एक लाखशेतीची कामे करताना अपघात झाल्यास अथवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते

अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखएखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची नुकसानभरपाई देण्यात येते.

मदतीसाठी अर्ज कोठे कराल?एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल, तसेच दावा अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील. अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल.

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाने ४५ दिवसांच्या आत योग्य कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपला प्रस्ताव दाखल करावा.     - जिल्हा कृषी अधीक्षक, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार