शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

१९७ अवैध शाळांनी दंड भरलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:12 IST

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही.

पालघर : या जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही. तसेच त्यांना बजावलेल्या नोटीसांना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या दंडाची संचित रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली असून आता काय आणि कशी कारवाई करावी? या शाळांनी दंड भरल्यास तो कोणत्या शिर्षाखाली जमा करावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या सीओंनी शिक्षण सचिवांकडून मागविले आहे.या जिल्ह्यातील १९९ अवैध शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना व पालकांना केले होते या शाळा वर्षानुवर्षे थैमान घालत असून ते रोखण्यासाठी शिक्षण विभाग काय कारवाई करणार? हा मुद्दा लोकमतने सतत लावून धरला होता. त्यावर सीईओंनी जंगी बैठक आयोजिली होती.तीमध्ये नियमानुसार अशा शाळांना आधी एक लाख रुपये दंड करावा व त्यानंतर प्रतिदिवशी १० हजार रुपये दंड करावा व ही शाळा अनधिकृत आहे तीमध्ये प्रवेश घेऊ नये असा फ्लेक्स तिच्या प्रवेशद्वारावर लावावा, असा निर्णय झाला होता.>दंडाची रक्कम १० कोटी ७८ लाख रुपयेप्रत्यक्षात मात्र चार-पाच शाळांच्या दर्शनी भागातच ही शाळा अवैध आहे. तिच्यात प्रवेश घेऊ नये असा फ्लेक्स लावण्यात आला. व बाकीच्या शाळांना मोकाट सोडून देण्याचा पराक्रम शिक्षण विभागाने केला होता.आता शैक्षणिक वर्षातील सहा महिने संपले तरी या शाळांवर नोटीसा पलीकडे कारवाई केली गेली नाही. नोटीस २० आॅक्टोबरला बजावली. ४ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम १० कोटी ७८ लाख रुपये झाली आहे.