शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

१९७ अवैध शाळांनी दंड भरलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:12 IST

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही.

पालघर : या जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही. तसेच त्यांना बजावलेल्या नोटीसांना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या दंडाची संचित रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली असून आता काय आणि कशी कारवाई करावी? या शाळांनी दंड भरल्यास तो कोणत्या शिर्षाखाली जमा करावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या सीओंनी शिक्षण सचिवांकडून मागविले आहे.या जिल्ह्यातील १९९ अवैध शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना व पालकांना केले होते या शाळा वर्षानुवर्षे थैमान घालत असून ते रोखण्यासाठी शिक्षण विभाग काय कारवाई करणार? हा मुद्दा लोकमतने सतत लावून धरला होता. त्यावर सीईओंनी जंगी बैठक आयोजिली होती.तीमध्ये नियमानुसार अशा शाळांना आधी एक लाख रुपये दंड करावा व त्यानंतर प्रतिदिवशी १० हजार रुपये दंड करावा व ही शाळा अनधिकृत आहे तीमध्ये प्रवेश घेऊ नये असा फ्लेक्स तिच्या प्रवेशद्वारावर लावावा, असा निर्णय झाला होता.>दंडाची रक्कम १० कोटी ७८ लाख रुपयेप्रत्यक्षात मात्र चार-पाच शाळांच्या दर्शनी भागातच ही शाळा अवैध आहे. तिच्यात प्रवेश घेऊ नये असा फ्लेक्स लावण्यात आला. व बाकीच्या शाळांना मोकाट सोडून देण्याचा पराक्रम शिक्षण विभागाने केला होता.आता शैक्षणिक वर्षातील सहा महिने संपले तरी या शाळांवर नोटीसा पलीकडे कारवाई केली गेली नाही. नोटीस २० आॅक्टोबरला बजावली. ४ डिसेंबरपर्यंत दंडाची रक्कम १० कोटी ७८ लाख रुपये झाली आहे.