शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणजूजवळ समुद्रात १४ संशयित ताब्यात; बांगलादेशी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:24 IST

वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे.

- हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील ।पालघर/बोर्डी : वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे. या घटनेत ४ बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाली आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तटरक्षक दलाने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डहाणू येथे तटरक्षक दलाने उभारलेल्या हॉवरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जाते. तटरक्षक दल, पोलीस, सीमा शुल्क विभाग, आदी विभागांतर्गत शनिवारी कमांडर एम. विजयकुमार, कमांडन्ट आर. श्रीवास्तव यांनी ‘सजग’ कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेंतर्गत एच १९४ या हॉवरक्राफ्टद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते. त्यावेळी सकाळी ११.३० वाजता पाणजू बेटानजीक १९.६० डिग्री उत्तरेकडे ६ बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर कॅप्टन कुमार यांनी आपल्या हॉवरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग करायला सुरु वात केली. यातील २ बोटी कोस्ट गार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य ४ बोटी तिवरालगत लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात पसार झाले.पकडण्यात आलेल्या लोकांकडे ओळखपत्रे किंवा कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच या बोटीवर नंबर, कलरकोड, त्या बोटींची नोंद या सर्व गोष्टींचा अभाव होता. हे सर्व १४ लोक त्यांच्या भाषेमुळे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. अधिक चौकशी केली असता या बोटींच्या मालकाचे नाव मायकल असल्याचे सांगून आबिल शेख (२५), शफीक उल (२७), आहाजीत (३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी. शेख (२२), शफीक उल (२७) एन. मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे. मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) या १४ तरुणांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले.संशयितांचा ताबा वसई पोलिसांकडे‘सजग’ मोहिमेंतर्गत समुद्रातील हालचालीकडे लक्ष देत असताना आम्हाला ही बोट जाताना दिसली. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. ठाणे-घोडबंदर भागातून ही बोट आल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर ते काही देशविघातक कारवाया करण्यासाठी आले होते का, याचा तपास करण्यासाठी त्या १४ लोकांना ताब्यात घेत नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.- कमांडर एम. विजयकुमार, (तटरक्षक दल)यापूर्वी घडलेल्या घटनावसई तालुक्यातील अर्नाळा किनारपट्टीवरून समुद्रात मासेमारीच्या नावाखाली भिवंडी-कल्याण भागातून काही लोक रबरी टायर, दोर, गळ आदी साहित्यानिशी जात असल्याच्या घटना सप्टेंबर, आॅक्टोबर २०१८ मध्ये घडल्या होत्या. याआधी ८-१० च्या संख्येने येणाºया या संशयित लोकांच्या संख्येत हळूहळू वाढ व्हायला लागली. काही स्थानिकांना थोडे पैसे देत त्यांच्या होडीच्या माध्यमातून रात्री जाणारे हे लोक पहाटेपर्यंत समुद्रात राहू लागल्याचा प्रकार घडला होता. तसेच, तारापूर, बोर्डीच्या किनाºयालगत काही संशयास्पद बोटी व बंदूकधारी दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.

टॅग्स :palgharपालघर