शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

पाणजूजवळ समुद्रात १४ संशयित ताब्यात; बांगलादेशी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:24 IST

वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे.

- हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील ।पालघर/बोर्डी : वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे. या घटनेत ४ बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाली आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तटरक्षक दलाने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डहाणू येथे तटरक्षक दलाने उभारलेल्या हॉवरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जाते. तटरक्षक दल, पोलीस, सीमा शुल्क विभाग, आदी विभागांतर्गत शनिवारी कमांडर एम. विजयकुमार, कमांडन्ट आर. श्रीवास्तव यांनी ‘सजग’ कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेंतर्गत एच १९४ या हॉवरक्राफ्टद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते. त्यावेळी सकाळी ११.३० वाजता पाणजू बेटानजीक १९.६० डिग्री उत्तरेकडे ६ बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर कॅप्टन कुमार यांनी आपल्या हॉवरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग करायला सुरु वात केली. यातील २ बोटी कोस्ट गार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य ४ बोटी तिवरालगत लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात पसार झाले.पकडण्यात आलेल्या लोकांकडे ओळखपत्रे किंवा कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच या बोटीवर नंबर, कलरकोड, त्या बोटींची नोंद या सर्व गोष्टींचा अभाव होता. हे सर्व १४ लोक त्यांच्या भाषेमुळे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. अधिक चौकशी केली असता या बोटींच्या मालकाचे नाव मायकल असल्याचे सांगून आबिल शेख (२५), शफीक उल (२७), आहाजीत (३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी. शेख (२२), शफीक उल (२७) एन. मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे. मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) या १४ तरुणांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले.संशयितांचा ताबा वसई पोलिसांकडे‘सजग’ मोहिमेंतर्गत समुद्रातील हालचालीकडे लक्ष देत असताना आम्हाला ही बोट जाताना दिसली. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. ठाणे-घोडबंदर भागातून ही बोट आल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर ते काही देशविघातक कारवाया करण्यासाठी आले होते का, याचा तपास करण्यासाठी त्या १४ लोकांना ताब्यात घेत नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.- कमांडर एम. विजयकुमार, (तटरक्षक दल)यापूर्वी घडलेल्या घटनावसई तालुक्यातील अर्नाळा किनारपट्टीवरून समुद्रात मासेमारीच्या नावाखाली भिवंडी-कल्याण भागातून काही लोक रबरी टायर, दोर, गळ आदी साहित्यानिशी जात असल्याच्या घटना सप्टेंबर, आॅक्टोबर २०१८ मध्ये घडल्या होत्या. याआधी ८-१० च्या संख्येने येणाºया या संशयित लोकांच्या संख्येत हळूहळू वाढ व्हायला लागली. काही स्थानिकांना थोडे पैसे देत त्यांच्या होडीच्या माध्यमातून रात्री जाणारे हे लोक पहाटेपर्यंत समुद्रात राहू लागल्याचा प्रकार घडला होता. तसेच, तारापूर, बोर्डीच्या किनाºयालगत काही संशयास्पद बोटी व बंदूकधारी दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.

टॅग्स :palgharपालघर