शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पाणजूजवळ समुद्रात १४ संशयित ताब्यात; बांगलादेशी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:24 IST

वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे.

- हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील ।पालघर/बोर्डी : वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे. या घटनेत ४ बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाली आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तटरक्षक दलाने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डहाणू येथे तटरक्षक दलाने उभारलेल्या हॉवरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जाते. तटरक्षक दल, पोलीस, सीमा शुल्क विभाग, आदी विभागांतर्गत शनिवारी कमांडर एम. विजयकुमार, कमांडन्ट आर. श्रीवास्तव यांनी ‘सजग’ कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेंतर्गत एच १९४ या हॉवरक्राफ्टद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते. त्यावेळी सकाळी ११.३० वाजता पाणजू बेटानजीक १९.६० डिग्री उत्तरेकडे ६ बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर कॅप्टन कुमार यांनी आपल्या हॉवरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग करायला सुरु वात केली. यातील २ बोटी कोस्ट गार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य ४ बोटी तिवरालगत लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात पसार झाले.पकडण्यात आलेल्या लोकांकडे ओळखपत्रे किंवा कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच या बोटीवर नंबर, कलरकोड, त्या बोटींची नोंद या सर्व गोष्टींचा अभाव होता. हे सर्व १४ लोक त्यांच्या भाषेमुळे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. अधिक चौकशी केली असता या बोटींच्या मालकाचे नाव मायकल असल्याचे सांगून आबिल शेख (२५), शफीक उल (२७), आहाजीत (३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी. शेख (२२), शफीक उल (२७) एन. मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे. मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) या १४ तरुणांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले.संशयितांचा ताबा वसई पोलिसांकडे‘सजग’ मोहिमेंतर्गत समुद्रातील हालचालीकडे लक्ष देत असताना आम्हाला ही बोट जाताना दिसली. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. ठाणे-घोडबंदर भागातून ही बोट आल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर ते काही देशविघातक कारवाया करण्यासाठी आले होते का, याचा तपास करण्यासाठी त्या १४ लोकांना ताब्यात घेत नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.- कमांडर एम. विजयकुमार, (तटरक्षक दल)यापूर्वी घडलेल्या घटनावसई तालुक्यातील अर्नाळा किनारपट्टीवरून समुद्रात मासेमारीच्या नावाखाली भिवंडी-कल्याण भागातून काही लोक रबरी टायर, दोर, गळ आदी साहित्यानिशी जात असल्याच्या घटना सप्टेंबर, आॅक्टोबर २०१८ मध्ये घडल्या होत्या. याआधी ८-१० च्या संख्येने येणाºया या संशयित लोकांच्या संख्येत हळूहळू वाढ व्हायला लागली. काही स्थानिकांना थोडे पैसे देत त्यांच्या होडीच्या माध्यमातून रात्री जाणारे हे लोक पहाटेपर्यंत समुद्रात राहू लागल्याचा प्रकार घडला होता. तसेच, तारापूर, बोर्डीच्या किनाºयालगत काही संशयास्पद बोटी व बंदूकधारी दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.

टॅग्स :palgharपालघर