शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांपासून राहणारी १२०० कुटुंबे बेघर; इमारती बांधताना महापालिकेची डोळेझाक का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 06:31 IST

स्थानिकांना अश्रू अनावर, नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवरील कारवाईला महापालिकेकडून सुरुवात

नालासोपारा - शहरातील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारतींवर पालिका प्रशासनाकडून तोडक कारवाईला सुरूवात झाली आहे. या इमारतींमध्ये सुमारे १,२०० कुटुंबे गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास होती. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

कारवाई होणार म्हणून काही सदनिका रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या होत्या. यातील अनेकांना घरे सोडताना अश्रू अनावर झाले. या कारवाईमुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे आता आम्ही कुठे जाणार? असा सवाल या रहिवाशांतून केला जात आहे. मनपाच्या प्रभाग समिती ‘डी’ मौजे आचोळे सर्व्हे नं. २२ ते ३२ व ८३ मधील अग्रवाल नगरी येथे डम्पिंग ग्राऊंड आणि मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्रासाठी भूखंड आरक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 

कारवाईप्रसंगी तगडा बंदोबस्तअनधिकृत इमारतींच्या कारवाईवेळी एक पोलिस उपायुक्त, एक सहायक पोलिस आयुक्त, सहा पोलिस निरीक्षक, २५ पोलिस अधिकारी, ११२ पुरुष पोलिस अंमलदार, ४२ महिला पोलिस अंमलदार, २० मसुब कर्मचारी, आरसीपी आणि एसआरपीएफचे चार प्लाटून असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इमारती बांधताना महापालिका कुठे होती? आरक्षित जागेवर एका दिवसात ४१ अनधिकृत इमारती उभ्या झाल्या का? त्यावेळी वसई-विरार महापालिका कुठे होती? मागील १४ वर्षांपासून कुटुंबासह येथे राहिलो. आयुष्यात कमावलेली पुंजी घरे विकत घेण्यासाठी लावली, ती घरे आज तुटत आहेत. यामुळे ज्या मनपा अधिकाऱ्यांच्या काळात या इमारती उभ्या राहिल्या, ज्यांनी बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक तडजोड करून मदत केली, त्या मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आक्रोश करणाऱ्या महिलांनी यावेळी केली.

डम्पिंग ग्राऊंड आणि मलनि:स्सारण प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील ४१ अनधिकृत इमारतींवर न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या सात इमारतींवर कारवाई केली जात आहे. इमारतीमधील रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले होते, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. ही अनधिकृत बांधकामे असल्याने कारवाई सुरू आहे. - अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

ज्यावेळी या इमारती उभ्या होत होत्या, त्यावेळी बांधकाम व्यवसायिकांनी घरे तुटणार नाहीत, असे सांगितल्याने घर घेतले. पण आज घरे तुटल्याने आम्ही बेघर झालो. त्यामुळे आम्हाला घराच्या बदल्यात घर द्यावे - गीता यादव, रहिवासी

माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी ही जमीन बळकावून, २०१० ते २०१२ या कालावधीत चार मजल्यांच्या ४१ अनधिकृत इमारती बांधल्या. काही वर्षांपूर्वी अजय शर्मा यांनी मनपाकडे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली. मात्र, कारवाई झाली नाही. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार