शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात २५ पैकी १२ पदे रिक्त !

By admin | Updated: January 11, 2017 05:58 IST

या तालुक्यातील गाव-खेडया-पाडयांत सध्या थंडी व वातारणातील बदलामुळे अनेक आजार बळावत असून दैनंदिन ३०० ते ३५० बाहय रुग्णांचा वाढता भार या

राहुल वाडेकर / विक्रमगडया तालुक्यातील गाव-खेडया-पाडयांत सध्या थंडी व वातारणातील बदलामुळे अनेक आजार बळावत असून दैनंदिन ३०० ते ३५० बाहय रुग्णांचा वाढता भार या ग्रामीण रुग्णालयावर पडत असून त्यामध्ये ताप-मलेरिया, टायफाईड, सर्पदंशाचे रुग्ण व गरोदर महिलांचा समावेश असतो. मात्र त्यान्ाां उपचार देणारे उपलब्ध कर्मचारी, यंत्रणा खूपच अपुरी असल्याने सध्या हे रुग्णालय सलाईनवर आहे. पूर्ण तालुक्याकरीता फक्त एकच वैद्यकिय अधिकारी(डॉक्टर) आपल्या अपु-या कर्मचा-यांना घेऊन तारेवरची करसतर करीत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षकासह, वैद्यकिय अधिकारी, सहा. अधिक्षक, क.लिपीक, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोग शाळा सहा., कक्षसेवक, सफाईगार अशा मंजूर २५ पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत. एकाच वैद्यकीय अधिका-यावर सा-या तालुक्याचा भार पडत असल्याने येथे डॉक्टरांबरोबरच, तज्ज्ञ डॉक्टरांची कमरतता वारंवार भासत आहे. तसे पाहीले तर या रुग्णालयात शासनाने आॅपरेशनकरीता लागणारी महागडी आवश्यक ती यंत्रसामुग्री दिलेली आहे. परंतु ती चालविण्यास अगर त्याचा वापर करण्यास तज्ज्ञ डॉक्टर अगर त्या विभागातील कर्मचारी नसल्याने त्याचा फायदा रुग्णांना होतांना दिसत नाही. तर यंत्रसामुग्रीकरीता असलेले तपासणी किट वेळेवर दिले जात नसल्याने उपलब्ध किटमधील औषध संपल्यावर अडचण निर्माण होत असतात. तसेच या रुग्णालयातील ही परिस्थती तालुका निर्मितीपासूनची असून तात्पुरत्या स्वरुपात येथे वैदयकिय अधिकारी म्हणून डॉ.मिलिंंद खांडवी यांना देण्यात आलेले होते. त्यांचाही तात्पुरतीचा कार्यकाळ संपल्याने त्यांना आता कासा रुग्णालयात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णांचा वाढता भार पाहता डॉ.मिलिंंद खांडवी यांना इतरत्र नियुक्ती देण्याएैवजी विक्रमगड येथेच कायम करावे अशी मागणी होत आहे.इमारत छान सुविधांची मात्र सारीच बोंबच्१९९९ मध्ये लोकसंख्येच्या आधारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यापूर्वी हे रुग्णालय गेली नऊ ते दहा वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत चालविले जात होते व नंतर चार वर्षापूर्वी ते नवीन सुसज्ज इमारतीत हलविलण्यांत आले. मात्र त्यावेळेस फक्त प्रमुख इमारतच सुसज्ज होती बाकी सर्व काम अर्धवटच होती तर अनेक पदेही रिक्तच होती. त्यामुळे जरी इमारत चांगली असली तरी येथे पाहीजे ते उपचार होत नव्हतेच आजही येथे प्राथमिकच उपचार केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक व रुग्ण करीत आहेत. त्याला येथील डॉक्टर व कर्मचारीही खाजगीत दुजोरा देत आहेत.च्हा जंगली व आदिवासी भाग असल्याने साथीचे आजार नेहमीच बळावतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर व पूर्ण कर्मचारी असणे आवश्यक आहे. कारण तालुक्यातील ९४ गावपाडे व दिड लाख लोकसंख्येकरीता हेच मोठे व योग्य औषधोपचार मिळाणारे एकच रुग्णालय आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.च्ग्रामीण खेडयापाडयातील व शहरातील घाणीचे साम्रज्य, खड्ड्यातील गढूळ पाणी व मातीमिश्रीत पाण्याचे सेवन, उघडयावरील दूषित पदार्थ खाणे यामुळे आजार बळावत आहेत. तालुक्यात जंगल असल्याने तसेच खेडयातील लोक रा़त्रं-दिवस शेतात काम करीत असल्याने संर्पदंशचे रुग्ण हमखास दाखल होत आहेत, च्तर घाणीचे साम्राज्य, उघड्यावर होणारे मलमूत्र विसर्जन जागोजागी तयार होणारी गटारींची डबकी, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, तुंबलेले सांडपाणी त्यापासून होणारी डासांची मोठी उत्पत्ती या कारणाने मलेरिया, टायफाईड, डायरिया, गॅस्ट्रो हे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात बळवतात व त्याचे रुग्ण या ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. विक्रमगड रुग्णालयाचे प्रमुखपद रिक्त असल्याने कुणाही कर्मचा-यावर कुणाचा अंकुश नाही. त्यामुळे येथे सर्वच सावळा गोेंधळ चालू आहे. जो तो कर्मचारी आपली मनमानी करीत आहे. कुणीही औषधे देतात, कुणीही केसपेपर काढतो, कुणीही नाईट शिफ्ट घेतो, असे चित्र आहे. वरिष्ठांनी या रुग्णालयाची चौकशी करुन यावर अंकुश ठेवावा अशी मागणी आहे.