शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

कोल्हापुरी मिरचीचा १२ लाखांचा ठसका

By admin | Updated: May 31, 2016 02:47 IST

दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार

शिरोळ: दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार महिन्यांत दहा लाख रुपयांहून अधिक नफा मिळविला आहे. अजून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे़ अन्य शेतकरी हे पिक पाहण्यासाठी येत आहेत़ हाळ चिंचवाड भागात पाटोळे यांची शेती आहे़ त्यातील सत्तर गुंठ्यांच्या क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यात उभी-आडवी नांगरणी करून मशागत केली़ यानंतर डीएपी, पोटॅश, बोलोफॉल, लिंबोळी पेंड, पेरॅमिन, रिझेटर, आदींचे मिश्रण करून रानात टाकल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने साडेचार फुटी सऱ्या सोडल्या़योग्य पद्धतीने बेड व ठिबक पाईप केल्या़ बेडवर मिल्चिंग पेपर अंथरूण व्हीएनआर १०९/३३२ जातीच्या मिरचीची सत्तर गुंठे क्षेत्रात १५ हजार ५०० रोपे लावली़ त्यानंतर दोन दिवसाआड बुरशीनाशक आळवणी करून घेण्यात आली, तर प्रत्येकी चार दिवसांनी पीक सुधरण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ मिरचीला टोमॅटोसारखी तारकाठी बांधली़ तीस दिवसांनंतर मिरची लागणीला सुरुवात झाली़ फुलकळीच्या काळात योग्य औषधफवारणी करून पहिली तोडणी ४५ दिवसांनंतर केली़ पहिल्या तोडणीला एक टन मिरची निघाली़मिरचीला सरासरी ४०, ५०, ६०, ७५ रुपये किलोला दर लागत असून, मिरचीची आवक सध्या बाजारात कमी असल्याने या मिरचीला सांगली, मिरज, कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांकडून मागणी आहे़ सध्या उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने मिरची पीक धोक्यात येण्याची शक्यता होती़ मात्र, पाटोळे यांनी या पिकाची व्यवस्थीतपणे काळजी घेऊन पीक योग्य त्या पद्धतीने टिकवून अग्रेसर उत्पादन घेतले जात आहे़ मिरचीचे दररोज ८०० ते ९०० किलो उत्पादन निघत आहे. त्यातून ५० ते ६० हजार रुपय मिळत आहेत़. प्रतिपोते २० रुपये वाहतूक व कामगारांचा पगार वगळता ४० ते ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा दररोज मिळत आहे़ दरम्यान, अजून दोन महिन्यात २० टन मिरची निघण्याची अपेक्षा आहे़ त्यातून आठ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते, अशी आशा पाटोळे यांना आहे़ या मिरची लागवडीसाठी पाटोळे यांना दोन लाख रुपये खर्च आला होता़ दैनंदिन कामगारांचा पगार व वाहतूक तसेच औषधे यांना पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो़़ त्यातूनच आतापर्यंत तोडा झालेल्या ३० टन मिरचीतून १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ अजूनही चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)