शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

कोल्हापुरी मिरचीचा १२ लाखांचा ठसका

By admin | Updated: May 31, 2016 02:47 IST

दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार

शिरोळ: दुष्काळावर मात करून ४१ डिग्रीच्या तापमानात चिंचवाड (ता़ शिरोळ) येथील सचिन व युवराज गुंडूराम पाटोळे या दोन भावांनी सत्तर गुंठे क्षेत्रात मिरचीचे अग्रेसर उत्पादन घेऊन चार महिन्यांत दहा लाख रुपयांहून अधिक नफा मिळविला आहे. अजून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे़ अन्य शेतकरी हे पिक पाहण्यासाठी येत आहेत़ हाळ चिंचवाड भागात पाटोळे यांची शेती आहे़ त्यातील सत्तर गुंठ्यांच्या क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यात उभी-आडवी नांगरणी करून मशागत केली़ यानंतर डीएपी, पोटॅश, बोलोफॉल, लिंबोळी पेंड, पेरॅमिन, रिझेटर, आदींचे मिश्रण करून रानात टाकल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने साडेचार फुटी सऱ्या सोडल्या़योग्य पद्धतीने बेड व ठिबक पाईप केल्या़ बेडवर मिल्चिंग पेपर अंथरूण व्हीएनआर १०९/३३२ जातीच्या मिरचीची सत्तर गुंठे क्षेत्रात १५ हजार ५०० रोपे लावली़ त्यानंतर दोन दिवसाआड बुरशीनाशक आळवणी करून घेण्यात आली, तर प्रत्येकी चार दिवसांनी पीक सुधरण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ मिरचीला टोमॅटोसारखी तारकाठी बांधली़ तीस दिवसांनंतर मिरची लागणीला सुरुवात झाली़ फुलकळीच्या काळात योग्य औषधफवारणी करून पहिली तोडणी ४५ दिवसांनंतर केली़ पहिल्या तोडणीला एक टन मिरची निघाली़मिरचीला सरासरी ४०, ५०, ६०, ७५ रुपये किलोला दर लागत असून, मिरचीची आवक सध्या बाजारात कमी असल्याने या मिरचीला सांगली, मिरज, कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांकडून मागणी आहे़ सध्या उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने मिरची पीक धोक्यात येण्याची शक्यता होती़ मात्र, पाटोळे यांनी या पिकाची व्यवस्थीतपणे काळजी घेऊन पीक योग्य त्या पद्धतीने टिकवून अग्रेसर उत्पादन घेतले जात आहे़ मिरचीचे दररोज ८०० ते ९०० किलो उत्पादन निघत आहे. त्यातून ५० ते ६० हजार रुपय मिळत आहेत़. प्रतिपोते २० रुपये वाहतूक व कामगारांचा पगार वगळता ४० ते ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा दररोज मिळत आहे़ दरम्यान, अजून दोन महिन्यात २० टन मिरची निघण्याची अपेक्षा आहे़ त्यातून आठ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते, अशी आशा पाटोळे यांना आहे़ या मिरची लागवडीसाठी पाटोळे यांना दोन लाख रुपये खर्च आला होता़ दैनंदिन कामगारांचा पगार व वाहतूक तसेच औषधे यांना पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो़़ त्यातूनच आतापर्यंत तोडा झालेल्या ३० टन मिरचीतून १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ अजूनही चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)