शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

मीरा भाईंदर शहरात सरकारच्या अर्थ सहाय्याने ११ आरोग्य केंद्रे होणार सुरू

By धीरज परब | Updated: May 2, 2023 18:45 IST

सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मीरा भाईंदर शहरात ११ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार आहेत.

मीरारोड : सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मीरा भाईंदर शहरात ११ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार आहेत. त्यापैकी एका केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा सुविधे साठी १० प्राथमिक  आरोग्य केंद्रे व २ उपकेंद्रे सुरू केलेली आहेत. सदर आरोग्य केंद्रां मधून नागरिकांना नाममात्र दरात बह्योपचारची सुविधा मिळते. त्यामुळे पालिकेची आरोग्य केंद्रे  ही सामान्य नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहेत. रोज सरासरी सुमारे हजार ते अकराशे रुग्ण आरोग्य केंद्रातील उपचारांचा लाभ घेत असतात. 

शहराची वाढती लोकसंख्या पाहता सदर प्राथमिक आरोग्य केंद्र ही कमी पडत आहेत. नागरिकांची गर्दी त्यातच विविध प्रकारचे लसीकरण आदी सुरू असल्याने सध्याच्या आरोग्य केंद्रांवर ताण पडतो. शिवाय आरोग्य केंद्र च्या परिसरातील नागरिकांना लाभ मिळत असला तरी अन्य भागातील नागरिकांना ही सुविधा मिळत नव्हती.

 आता सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी अभियानाअंतर्गत निधी टप्या टप्याने उपलब्ध होत असल्याने शहरात आणखी ११ आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता पर्यंत ज्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नव्हता त्यांना नाममात्र दरात आरोग्य सेवा मिळणार आहे.

११ पैकी ६ आरोग्य वर्धिनी केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर उर्वरित केंद्राचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. इंद्रलोक येथील पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र हे १ मे महाराष्ट्र दिनी आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते लोकांच्या सेवेत  सुरू करण्यात आले आहे. यावेळी पालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. उर्वरित केंद्रे ही टप्प्या टप्प्याने सुरू केली जाणार आहेत. १५ ते २० हजार लोकसंख्ये मागे एक आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निकष आहे . 

सदर आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी , परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग स्टाफ इतका मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे. सदर केंद्रामध्ये बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी व लसीकरण या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली. सदर आरोग्यवर्धिनी केंद्राचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर