शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:25 IST

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवघेणे बनत असून, गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर हे दोन्ही टोलनाके बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ टोल नाके बंद करण्यात आले होते. 

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, असा पवित्रा खा. गावित यांनी घेत ठेकेदार कंपनीला धारेवर धरले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस , सुमित कुमार, ऋषिकेश पाटील, तसेच कासा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, महामार्ग पोलिस निरीक्षक बाळू राठोड आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत शंभरहून अधिक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. वारंवार इशारा देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत ठेकेदार कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसताना टोल मात्र वसूल केला जात आहे. यामुळे शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धडक देत वाहनांकडून केली जाणारी टोल वसुली बंद केली. 

खानिवडे येथे काँग्रेसचे विजय पाटील, शिवसेना वसई-विरार जिल्हा अध्यक्ष नीलेश तेंडोलकर आदींनी भाग घेत टोल वसुली बंद केली, तर डहाणूच्या रोटी टोल नाक्यावर साडेबारा वाजता खा. राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख उपस्थित होते.

आम्ही सत्ताधारी पक्षात असलो; तरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. सद्या या मार्गावर खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर टोल बंद आंदोलन करावे लागले.- राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना

महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. अनेक वेळा आंदोलने केली असून, या महामार्गाची सुधारणा केली जात नाही याची खंत आहे.- श्रीनिवास वनगा, आमदार शिवसेना.

टॅग्स :tollplazaटोलनाका