शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:25 IST

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवघेणे बनत असून, गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर हे दोन्ही टोलनाके बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ टोल नाके बंद करण्यात आले होते. 

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, असा पवित्रा खा. गावित यांनी घेत ठेकेदार कंपनीला धारेवर धरले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस , सुमित कुमार, ऋषिकेश पाटील, तसेच कासा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, महामार्ग पोलिस निरीक्षक बाळू राठोड आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत शंभरहून अधिक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. वारंवार इशारा देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत ठेकेदार कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसताना टोल मात्र वसूल केला जात आहे. यामुळे शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धडक देत वाहनांकडून केली जाणारी टोल वसुली बंद केली. 

खानिवडे येथे काँग्रेसचे विजय पाटील, शिवसेना वसई-विरार जिल्हा अध्यक्ष नीलेश तेंडोलकर आदींनी भाग घेत टोल वसुली बंद केली, तर डहाणूच्या रोटी टोल नाक्यावर साडेबारा वाजता खा. राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख उपस्थित होते.

आम्ही सत्ताधारी पक्षात असलो; तरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. सद्या या मार्गावर खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर टोल बंद आंदोलन करावे लागले.- राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना

महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. अनेक वेळा आंदोलने केली असून, या महामार्गाची सुधारणा केली जात नाही याची खंत आहे.- श्रीनिवास वनगा, आमदार शिवसेना.

टॅग्स :tollplazaटोलनाका