शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:25 IST

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवघेणे बनत असून, गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर हे दोन्ही टोलनाके बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ टोल नाके बंद करण्यात आले होते. 

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, असा पवित्रा खा. गावित यांनी घेत ठेकेदार कंपनीला धारेवर धरले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस , सुमित कुमार, ऋषिकेश पाटील, तसेच कासा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, महामार्ग पोलिस निरीक्षक बाळू राठोड आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत शंभरहून अधिक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. वारंवार इशारा देऊनही महामार्ग दुरुस्तीबाबत ठेकेदार कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसताना टोल मात्र वसूल केला जात आहे. यामुळे शुक्रवारी खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धडक देत वाहनांकडून केली जाणारी टोल वसुली बंद केली. 

खानिवडे येथे काँग्रेसचे विजय पाटील, शिवसेना वसई-विरार जिल्हा अध्यक्ष नीलेश तेंडोलकर आदींनी भाग घेत टोल वसुली बंद केली, तर डहाणूच्या रोटी टोल नाक्यावर साडेबारा वाजता खा. राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख उपस्थित होते.

आम्ही सत्ताधारी पक्षात असलो; तरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. सद्या या मार्गावर खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत खड्ड्यांमुळे घोडबंदर ते तलासरीदरम्यान १०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बाबतीत सूचना देऊन सुधारणा न झाल्याने अखेर टोल बंद आंदोलन करावे लागले.- राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना

महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. अनेक वेळा आंदोलने केली असून, या महामार्गाची सुधारणा केली जात नाही याची खंत आहे.- श्रीनिवास वनगा, आमदार शिवसेना.

टॅग्स :tollplazaटोलनाका