शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पालघर जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:07 IST

युवक-युवती बाधित होत असल्याने चिंता

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर जिल्ह्यातील ४५ वयोगटातील ४८ हजार ५६६ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून १ हजार ४६९ नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने लसीकरण मोहीम काहीशी थंडावली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १६ वर्षे वर्षांखालील एकूण १ हजार ६९३ जणांना कोरोनाने ग्रासले आहे.पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अल्पवयीन मुलांचे तसेच तरुणांचे प्रमाण नगण्य होते. आता ते वाढल्याने चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. एकीकडे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरासह आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे. सरकारने अद्याप ४५ वर्षांखालील नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे लहान मुले तसेच तरुणही बाधित होत असले तरी त्यांना अद्याप लस दिली जात नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

४५ पेक्षा कमी वयाच्या लोकांना दिली जात नाहीजिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सध्या १६ हजार ४६० लोक कोरोनाने बाधित असून त्यात १६ वर्षांखालील १ हजार ६९३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के आहे. दरम्यान, ४५ पेक्षा कमी वयाचे १० हजार ८११ रुग्ण आहेत. मात्र लसीकरणाचा आदेश नसल्याने त्यांच्या लसीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. १६ ते ४५ या वयोगटातील ९ हजार ४५७ लोक बाधित आहेत. 

मुलांना लस येत नाही, तोपर्यंत निर्बंध पाळा मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत त्या मुलांना कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे लागणार आहे. दुसरीकडे त्यांच्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासाला प्राधान्य देत घरीच राहण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

मुलांमध्ये प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ते कोरोनाबाधित झाले तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्र शासन २५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत प्रयत्नशील आहे. तोपर्यंत मुलांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी.- डॉ. आर. व्ही. दिघुले, पालघर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस