शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

झुडपी जंगल होणार ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:38 IST

पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे.

ठळक मुद्दे२६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : संगोपनाचे मॉडेल तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यंदा बहुतांश वृक्ष लागवड जिल्ह्यातील झुडपी जंगलावर करण्यात येणार असून त्यांना ‘आॅक्सिजन पार्क’, असे संबोधण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांपासून १ ते ७ जुलै दरम्यान महावृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. हे तिसरे वर्ष असून यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात २६ लाख ७७ हजार ३४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यात ५० हजार वृक्ष लागवडीचा एक गट निवडण्यात येईल. झाडे टिकविण्यासाठी तिथे कुंपण व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. झाडांना पाणी व खत देण्यासाठी म.गां.रोहयोमधून मजूर लावण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून झुडपी जागेची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवड होईल, अशी जागा ग्रामपंचायतीने निवडून त्यावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.१० हजारांच्या वर एका ठिकाणी वृक्ष लागवड करणाऱ्या विभागाने त्या ठिकाणी पाणी, कुंपण व पाणी देण्यासाठी मजुराची व्यवस्था, अशा पद्धतीने मॉडेल तयार करूनच काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी आज झालेल्या वृक्ष लागवड बैठकीत दिल्या. स्वयंसेवी संस्थांनी जमिनीचे मोठे पट्टे निवडून वृक्ष लागवड करावी. कोणत्या विभागाकडे वा संस्थेकडे वृक्ष लावण्यासाठी जमीन नसल्यास जमिनीची मागणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. तेथील लोकांच्या उपयोगात येतील, असे वृक्ष लावण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम कमी झाले आहे. मे अखेरपर्यंत सर्व मोठ्या विभागांनी ८० टक्के काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, उपवनसरंक्षक सुनील वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, इतर विभाग प्रमुख व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्टविभागनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात वनविभाग ७ लाख ९५ हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जि.प. ६ लाख २९ हजार ८८०, शालेय शिक्षण १ लाख २२ हजार ८०, कृषी विभाग ३ लाख १२ हजार ६२५, जलसंपदा १ लाख ७ हजार ५३५, गृह विभाग ४१ हजार ९०, सार्वजनिक बांधकाम ३८,११०, नगर विकास २०,६७५, जलसंधारण निम्न वर्धा २४,८१०, पाणी पुरवठा व स्वच्छता २०,३३०, इतर विभाग ६५,२०५ असे एकूण २६ लक्ष ७७ हजार ३४० वृक्षांचे उद्दिष्ट आहे.