शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
3
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
4
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
5
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
6
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
7
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
8
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
9
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
10
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
11
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
12
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
13
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
14
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
15
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
16
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
17
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
18
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
19
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
20
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देआगरगाव शिवारातील घटना । नातेवाईकांसह नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : जनावरे सोडण्याकरिता शेतात गेलेल्या युवकावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले. ही घटना आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत तत्काळ मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.भुमेश रमेश गाखरे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घरची जनावरे चारण्याकरिता शेतात गेला होता. जनावरे चारल्यानंतर शेतात बांधून तो जेवन करण्याकरिता दुपारी घरी परत आला. जेवन करुन चार वाजता पुन्हा जनावरे सोडण्याकरिता शेतात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने भुमेशवर अचानक हल्ला चढविला. यात तो जागीच गतप्राण झाला. सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पण, येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या आक्रोश वाढला. यावेळी स्थनिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मृतकाच्या परिवाराला तत्काळ मदत आणि घरातील एका व्यक्तिला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.वाघाची दहशत कायमतालुक्यात मागील तीन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. यापूर्वी धानोली येथील शेतकºयावर वाघाने हल्ला केला होता. तर दुसरी घटना सिंदीविहिरी येथे घडली.येथेही शेतकºयावर हल्ला केला पण ते थोडक्यात बचावले. आजची तिसरी घटना असून परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे आता कशी करावी, असा प्रश्न शेकऱ्यांना पडला असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग