शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देआगरगाव शिवारातील घटना । नातेवाईकांसह नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : जनावरे सोडण्याकरिता शेतात गेलेल्या युवकावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले. ही घटना आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत तत्काळ मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.भुमेश रमेश गाखरे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घरची जनावरे चारण्याकरिता शेतात गेला होता. जनावरे चारल्यानंतर शेतात बांधून तो जेवन करण्याकरिता दुपारी घरी परत आला. जेवन करुन चार वाजता पुन्हा जनावरे सोडण्याकरिता शेतात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने भुमेशवर अचानक हल्ला चढविला. यात तो जागीच गतप्राण झाला. सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पण, येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या आक्रोश वाढला. यावेळी स्थनिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मृतकाच्या परिवाराला तत्काळ मदत आणि घरातील एका व्यक्तिला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.वाघाची दहशत कायमतालुक्यात मागील तीन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. यापूर्वी धानोली येथील शेतकºयावर वाघाने हल्ला केला होता. तर दुसरी घटना सिंदीविहिरी येथे घडली.येथेही शेतकºयावर हल्ला केला पण ते थोडक्यात बचावले. आजची तिसरी घटना असून परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे आता कशी करावी, असा प्रश्न शेकऱ्यांना पडला असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग