शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

युवकांनी गांधीजींचे विचार अंगिकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:49 IST

सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल.

ठळक मुद्देटी.आर.एन. प्रभू : तीन दिवसीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. तरच गांधी समजेल, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील महादेव भाई भवन मध्ये युवक व युवतींसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, ज्योती कोरडे, दीप्ती लखूम, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, बजरंग सोनवने आदींची उपस्थिती होती.प्रभू पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला. तर महात्मा गांधी यांनी सत्य-अहिंसेचा संदेश देत स्री- पुरूष समानता क्रुतीतून आपल्या समोर ठेवली. आपण याची सुरूवात घरातून करावी. इंग्रजी भाषेला आपण सध्या जास्त महत्त्व देत असून ही चिंतेची बाब आहे, असे सांगितले.महादेव विद्रोही म्हणाले की, शिबीर स्थळाचे नाव महादेव भाई भवन आहे. याच महत्त्व आपण जाणले पाहिजे. गांधीजींनी समानता अंगीकारली होती. आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समानता निर्माण होणार नाही. यावर बापूंचा विश्वास होता. छत्तीसगड राज्य नैसर्गिकरित्या संपन्न; पण सर्वात गरीबी तेथे दिसून येते. गांधी विचार शिबिरार्थ्यांनी समजावून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्योती कोरडे, दीप्ती लखूम यांनीही विचार व्यक्त केले. परिचय अविनाश काकडे, बजरंग भाई यांनी करून दिला. संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयेश शेलार यांनी मानले. शिबिरात ७० युवक- युवती सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी