शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

युवकांनी गांधीजींचे विचार अंगिकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:49 IST

सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल.

ठळक मुद्देटी.आर.एन. प्रभू : तीन दिवसीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. तरच गांधी समजेल, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील महादेव भाई भवन मध्ये युवक व युवतींसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, ज्योती कोरडे, दीप्ती लखूम, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, बजरंग सोनवने आदींची उपस्थिती होती.प्रभू पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला. तर महात्मा गांधी यांनी सत्य-अहिंसेचा संदेश देत स्री- पुरूष समानता क्रुतीतून आपल्या समोर ठेवली. आपण याची सुरूवात घरातून करावी. इंग्रजी भाषेला आपण सध्या जास्त महत्त्व देत असून ही चिंतेची बाब आहे, असे सांगितले.महादेव विद्रोही म्हणाले की, शिबीर स्थळाचे नाव महादेव भाई भवन आहे. याच महत्त्व आपण जाणले पाहिजे. गांधीजींनी समानता अंगीकारली होती. आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समानता निर्माण होणार नाही. यावर बापूंचा विश्वास होता. छत्तीसगड राज्य नैसर्गिकरित्या संपन्न; पण सर्वात गरीबी तेथे दिसून येते. गांधी विचार शिबिरार्थ्यांनी समजावून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्योती कोरडे, दीप्ती लखूम यांनीही विचार व्यक्त केले. परिचय अविनाश काकडे, बजरंग भाई यांनी करून दिला. संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयेश शेलार यांनी मानले. शिबिरात ७० युवक- युवती सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी