शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

तुम्ही एकटे नाही, ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे

By admin | Updated: May 18, 2015 02:00 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला, मुलींकरिता सेवाग्राम यात्रीनिवासात शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सेवाग्राम : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला, मुलींकरिता सेवाग्राम यात्रीनिवासात शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी शिबिराचा समारोप झाला. सात दिवस चाललेल्या या शिबिरातून अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी या चिमुकल्यांना ‘तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहो. ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे’ असे मार्गदर्शन करीत त्यांची हिंमत बांधण्याचा प्रयत्न केला. यात्री निवासात एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली, मुलांसाठी मार्गदर्शन शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष संगीता धनाढ्य होत्या. अतिथी म्हणून सुषमा पाखरे, अजय भोयर, राजेंद्र मिरापूरकर, प्रकल्प समन्वयक किशोर जगताप, रोटरी क्लबचे राकेश माहेश्वरी व भरत सोमानी उपस्थित होते. यावेळी वर्ग पहिले ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविकातून किशोर जगताप यांनी डॉ.एम.एस. स्वामिनाथन यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या पाल्यासाठी आयोजित या शिबिरात ५८ गावे आणि ६५ परिवारातील वर्ग पहिली ते बारावीपर्यंत १२६ विद्यार्थ्यांना या वेळी मदत देण्यात येत असल्याचे सांगितले. सेवाग्राम येथे आयोजित या शिबिरात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण १९ मुले- मुली सहभागी झाले होते. यावेळी सुषमा पाखरे, राजेंद्र मिरापूरकर, भरत सोमानी व अजय वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन ११ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रा. धनंजय सोनटक्के व जिल्हा बालकल्याण समितीचे अजय भोयर उपस्थित होते.शिबिरात योग, इंग्रजी, गणित, विज्ञान, आर्ट अ‍ॅन्ड क्राप्ट, शेतीवर्सन प्रश्नमंजुषा, कथाकथन, खेळ यासाठी बजाज विज्ञान केंद्रात शिबिरार्थीनी ज्ञान प्राप्त केले. अहवाल वाचन संयोजिका सोनाली फाटे यांनी केले. तर संचालन अश्विनी वानखेडे यांनी केले. आभार सोजल ठोंबरे हिने मानले. आयोजनाकरिता अनेकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)