शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

केळीच्या खोडव्यातून मिळविले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:04 IST

ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते.

ठळक मुद्देपाणी बचतीसाठी थिंबक सिंचन : खुरपणीचा खर्चही मचिंगमुळे वाचविला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते. परंतु वाघमारे यांनी जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. जळगाव येथील जैन फार्मला भेट देऊन तिथली माहिती गोळा केली. मार्च २०१७ ला जैन फार्मसकडून गॅ्रन्ड ९ नावाची केळीची टिश्यू बेण आणून लागवड केली. पाच एकराच ६२०० झाडे बसली. अकरा महिन्यात सदर पिकातून उत्पन्न आले. भाव चांगला असल्यामुळे त्यांना जवळपास २० लाख रू. मिळाले तर खर्च आला ४ लाख रू. इथून त्यांना बळ मिळाले व त्यांनी त्याच जागेवरील मुख्य झाड अर्धे तोडून त्याचे एक पिल वाढविणे सुरू केले. त्याचे उत्पन्नही नुकतेच सुरू झाले असून त्याचा सुद्धा घड मुख्य पिकाच्या घडाएवढाच मिळत आहे. खर्च मात्र ५ एकरासाठी फक्त ७० हजार एवढा झाला. सहसा केळी पिकाचा खोडवा घेऊ नये असा प्रघात होता. परंतु वाघमारे यांनी त्यांला बगल देत खोडवा पिक घेतले व उत्पादन ही घेत आहे. त्यांचा तिसरा खोडवाही घेण्याचा विचार असून त्यांनी मिळविलेल्या माहितीनुसार मुख्य पिकाला छाटल्यानंतर त्यात असलेले अन्नद्रव्य त्याला लागून असलेल्या पिलाला मिळते. त्यामुळे खोडवा पिकाला आगाऊचे जास्त खत देण्याची गरज भासत नाही व पिकाचीही वाढ जोमात होऊन खर्चात मोठी बचत होते.केळीची लागवड ही साधारणत: जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात केली जाते, परंतु वाघमारे हे मार्च पासून लागवड सुरू करतात. १ दीड महिन्याच्या अंतराने ते वेगवेगळे प्लॉट लावत असता. यामुळे त्यांची केळी वर्षभर सुरू असते. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो. त्यांना संपूर्ण बागेत मचींग केले असल्यामुळे त्यांचा निंदण खुरपणाचाही खर्च वाचतो. मंचींगसाठी एक एकराला १२ हजार रू. खर्च होतो. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असून जास्त तापमानाचा प्रभाव होऊ नये म्हणून सावरीचे कुंपण केले आहे.३० महिन्यात मुख्य पिकासह दोन खोडक्यासचे पाच एकरात कमीत कमी ५० लाख मिळतील, असा ठाम विश्वास वाघमारे यांना आहे. पहिल्या पिकाचे २० लाख मिळवून त्याची सुरूवातही झाली आहे. वाघमारे यांचे अनुकरण करायला इतर शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे.नाविण्यपूर्ण प्रयोगकुंदन वाघमारे शेतात केळीचेच उत्पादन घेतात. केळीसाठी विविध प्रयोग ते करतात. केळींना नत्र मूलद्रव्य मिळावे यासाठी त्यांनी मोठे टाके तयार केले आहे. त्या माध्यमातून पिकांचे संगोपन केले जाते. शिवाय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुध्दा ते करतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती