शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केळीच्या खोडव्यातून मिळविले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:04 IST

ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते.

ठळक मुद्देपाणी बचतीसाठी थिंबक सिंचन : खुरपणीचा खर्चही मचिंगमुळे वाचविला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते. परंतु वाघमारे यांनी जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. जळगाव येथील जैन फार्मला भेट देऊन तिथली माहिती गोळा केली. मार्च २०१७ ला जैन फार्मसकडून गॅ्रन्ड ९ नावाची केळीची टिश्यू बेण आणून लागवड केली. पाच एकराच ६२०० झाडे बसली. अकरा महिन्यात सदर पिकातून उत्पन्न आले. भाव चांगला असल्यामुळे त्यांना जवळपास २० लाख रू. मिळाले तर खर्च आला ४ लाख रू. इथून त्यांना बळ मिळाले व त्यांनी त्याच जागेवरील मुख्य झाड अर्धे तोडून त्याचे एक पिल वाढविणे सुरू केले. त्याचे उत्पन्नही नुकतेच सुरू झाले असून त्याचा सुद्धा घड मुख्य पिकाच्या घडाएवढाच मिळत आहे. खर्च मात्र ५ एकरासाठी फक्त ७० हजार एवढा झाला. सहसा केळी पिकाचा खोडवा घेऊ नये असा प्रघात होता. परंतु वाघमारे यांनी त्यांला बगल देत खोडवा पिक घेतले व उत्पादन ही घेत आहे. त्यांचा तिसरा खोडवाही घेण्याचा विचार असून त्यांनी मिळविलेल्या माहितीनुसार मुख्य पिकाला छाटल्यानंतर त्यात असलेले अन्नद्रव्य त्याला लागून असलेल्या पिलाला मिळते. त्यामुळे खोडवा पिकाला आगाऊचे जास्त खत देण्याची गरज भासत नाही व पिकाचीही वाढ जोमात होऊन खर्चात मोठी बचत होते.केळीची लागवड ही साधारणत: जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात केली जाते, परंतु वाघमारे हे मार्च पासून लागवड सुरू करतात. १ दीड महिन्याच्या अंतराने ते वेगवेगळे प्लॉट लावत असता. यामुळे त्यांची केळी वर्षभर सुरू असते. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो. त्यांना संपूर्ण बागेत मचींग केले असल्यामुळे त्यांचा निंदण खुरपणाचाही खर्च वाचतो. मंचींगसाठी एक एकराला १२ हजार रू. खर्च होतो. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असून जास्त तापमानाचा प्रभाव होऊ नये म्हणून सावरीचे कुंपण केले आहे.३० महिन्यात मुख्य पिकासह दोन खोडक्यासचे पाच एकरात कमीत कमी ५० लाख मिळतील, असा ठाम विश्वास वाघमारे यांना आहे. पहिल्या पिकाचे २० लाख मिळवून त्याची सुरूवातही झाली आहे. वाघमारे यांचे अनुकरण करायला इतर शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे.नाविण्यपूर्ण प्रयोगकुंदन वाघमारे शेतात केळीचेच उत्पादन घेतात. केळीसाठी विविध प्रयोग ते करतात. केळींना नत्र मूलद्रव्य मिळावे यासाठी त्यांनी मोठे टाके तयार केले आहे. त्या माध्यमातून पिकांचे संगोपन केले जाते. शिवाय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुध्दा ते करतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती