शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:30 IST

जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देविद्या मानकर : सामूहिक उपाययोजना केल्यास अटकाव शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सामुहिक उपाययोजनाच गुलाबी बोंडअळीला अटकाव घालू शकतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली.मानकर पुढे म्हणाल्या, गत वर्षीच्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेळाकुटीस आला होता. कापूस उत्पादकांना त्यावेळी मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे २ लाख २६ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. एकट्या कृषी विभागाच्या प्रयत्नाने गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक कपाशी उत्पादक शेतकऱ्याने पुढे येत कृषी तज्ज्ञांकडून सुचविलेल्या योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.गत दोन महिन्यांपासून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून चित्र रथ व ठिकठिकाणी कार्यशाळा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फरदड कापूस घेऊ नये, पूर्व हंगामी लागवड करू नये, योग्य वाणाची निवड करावी, पिकांची फेरपालट करावी, दोनपेक्षा अधिक कीटकनाशके मिसळून फवारणी करू आदी विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय सध्याही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोमवार १६ जुलैपासून विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही अडचण असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.सोमवारपासून गावपातळीवर शिबिरगुलाबी बोेंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कपाशी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गाव पातळीवर विशेष कार्यशाळा व शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण आल्यास त्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्याना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी