शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

यंदा केवळ २५ टक्केच पोपट रामनगरात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत.

ठळक मुद्देवृक्षतोडीचा परिणाम; पाच दशकांची परंपरा खंडित, जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रामनगर भागातील मगनवाडी परिसरातील डेरेदार वृक्षांची विकासाच्या नावावर कत्तल करण्यात आली. याचा परिणाम तेथे मुक्कामी येणाऱ्या पोपटांवर झाला असून यंदा केवळ २५ टक्केच पोपट परतल्याची नोंद एका ज्येष्ठ वन्यजीव प्रेमीने घेतली आहे. विकासाच्या नावावर होणारी वृक्ष कत्तल वेळीच थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे अन्यथा सुमारे पाच दशकांची परंपरा खंडित होईल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.वर्धा शहराचा हरित भाग म्हणून ओळख असलेल्या एमगिरी आणि मगनवाडी भागात मागील अनेक वर्षांपासून सायंकाळच्या सुमारास लाखो पोपट मुक्कामी यायचे. सध्या मुक्कामी येणाºया पोपटांची संख्या रोडावली असून त्याला विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली अवैध वृक्षतोड जबाबदार आहे. एरव्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या भागात मोठ्या संख्येने पोपट मुक्कामी यायचे. परंतु, यंदाच्या वर्षी केवळ २५ टक्केच पोपट आलेत. ७५ टक्के पोपट यंदा परत का आले नाही, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना तर निर्माण झाली नाही आदी सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.तीन वर्षांपासून करीत आहेत सखोल अध्ययनजेष्ठ वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा हे मागील तीन वर्षांपासून सदर विषयाचे अध्ययन करीत आहेत. शहरात होत असलेली अवैध वृक्षतोड हा प्रकार सध्या मगनवाडी भागात मुक्कामी येणाºया पोपटांचे तेथील अस्थित्त्वच संपविणारा ठरत असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या अध्ययनात पुढे आले आहे. एमगिरी आणि मगनवाडी येथील पोपटांचे अस्थित्त्व कायम रहावे, यासाठी शासकीय स्तरावर विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.रामनगर भागातील एमगिरी व मगनवाडी परिसरातील जैवविविधता दिवसेंदिवस नष्ट होत आहे. याचाच परिणाम तेथे मुक्कामी येणाºया पोपटांच्या संख्येवर झाला असल्याचे आतापर्यंतच्या माझ्या अध्ययनात पुढे आले आहे. जिल्ह्यातील पक्षीमित्र व जिल्हा प्रशासनाने एकत्र येत वेळीच योग्य पाऊल उचलले पाहिजे.- कौशल मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव प्रेमी, वर्धा.

टॅग्स :Natureनिसर्ग