शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कपाशीचा पेरा वाढणार

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून

अरुण फाळके - कारंजा(घा)गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यावर्षी सोयाबीन पेक्षा, कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तसेच सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच ती वापरा, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. कारंजा तालुक्यातील ३५ कृषी सेवा केंद्र बियाणे व खतांचा साठा करून विक्रीसाठी सज्ज झालेली आहेत. यावर्षी तालुक्यातील ४२ हजार ५०० हेक्टर जमीन खरीप हंगामासाठी लागवडीखाली येणार आहे. यात २५००० हेक्टरमध्ये सोयाबीन, ९५०० हेक्टरमध्ये कापूस, १ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, ६५०० हेक्टरमध्ये तूर, ३०० हेक्टरमध्ये भूईमुंग, तर २०० हेक्टरमध्ये इतर पिके घेतली जाणार असल्याचा अंदाज व नियोजन आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले. सुरवातीला भाव मिळाला नाही. परिणामी यावर्षी सोयाबीन पेक्षा कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे निकोप बियाणे सुद्धा तयार होवू शकले नाही. काही व्यापाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून, राज्यातून बियाणे आणून, शेतकऱ्यांसाठी विकण्यास उपलब्ध केले आहे. पण या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबद्दल कोणीही खात्री द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून घेतलेले असो वा घरचे बियाणे असो पुढील धोका व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उगवण क्षमता आपल्या घरी तपासूनच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जाहिररित्या करण्यात आले आहे.मागील वर्षी नापिकीमुळे त्रस्त झालेला शेतकरी हे महागडे बियाणे घेवू शकत नसल्यामुळे खासगीतून कमी दराचे सुटे बियाणे तो विकत घेत आहे. ६० ते ७० रूपये किलो असा खासगी बियाण्यांचा दर आहे. बँकांनी अद्याप क्रॉप लोन प्रकरणे मंजूर केलेली नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने क्रॉप लोन उपलब्ध करून द्यावे तसेच गारपीट व अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या किमान अल्पभूधारकांना तरी शासनाने विनामूल्य बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच पीककर्ज त्वरीत देण्यासाठी बँकांवर दडपण आणावे. असा आग्रह तालुक्यातील आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकऱ्यांनी धरलेला आहे. तालुक्यातील कृषी केंद्रात २५०० मेट्रीक टन रासायनिक खत, कपाशीच्या बियाण्याचे १५ हजार पॅकेट, व सोयाबीनचे पहिल्या टप्प्यात पुरेल येवढे बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल आदेवार यांनी दिली. पण बियाण्यांची उगवणशक्ती शेतकरी वर्गाने आधी तपासूनच नंतर पेरा करून दुबार पेरणीचा धोका टाळावा असे आवाहनही जिल्ह्यातील कास्तकारांना करण्यात आले आहे.