शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

यशोदा, भदाडी झाली सैराट; शेतीपिकांची लावलीय वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : पावसाच्या प्रतीक्षेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चिकणीसह परिसरात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची लागवड केली. पण, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जबाजारी होऊन पेरणी केली. पिके  अंकुरायला लागताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातून वाहणारी यशोदा आणि भदाडी नदीही सैराट झाली आणि शेतशिवारातील पिके खरडून नेली. त्यामुळे आता तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात ना कृषिमंत्री,  जिल्ह्यात ना पालकमंत्री- अलीकडेच राज्यात राजकीय भूकंप झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तर मिळाले. पण, मंत्र्यांचे खाते वाटप झाले नसल्याने या आपत्ती काळात राज्यात ना कृषिमंत्री आहे ना  जिल्ह्याला पालकमंत्री, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा कुणाकडे मांडावी. शेतकऱ्यांचा प्रश्न कोण तडीस लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सुरुवातीला पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागली. आता अतिवृष्टीने सर्व पिके खरडून गेल्याने तिबार पेरणीचे सावट आहे. या आपत्ती काळात राज्याला कृषिमंत्री नाही आणि जिल्ह्याला पालकमंत्री नाही, त्यामुळे कोणाकडे मागणी करावी, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने हेक्टरी २५ हजारांची मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- सतीश दाणी, राज्याध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्याकरिता जिल्ह्याला पालकमंत्रीही नाही. शेतकऱ्यांची अडचण कोण सोडविणार, हा प्रश्न आहे. शेतकऱ्याला नेहमीच अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई जाहीर करुन दिलासा द्यावा. - संजय वानखेडे,शेतकरी,जामणी. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती