शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

यश खासबागे जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

१८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान यशवंत महाविद्यालय वर्धाच्या यश चंद्रशेखर खासबागे याने पटकाविला. त्याने ९४.९२ टक्के गुण घेतले. तर द्वितीय स्थानी दोन विद्यार्थिनी राहिल्या. यात गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची निकीता द्वारकाप्रसाद पांडे व यशवंत महाविद्यालयाची साक्षी राजेंद्र कुळकर्णी यांचा समावेश आहे. या दोघींनीही ६१३ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.३० एवढी आहे. तृतीय स्थानही गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची वृशाली विजय मसने व हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. महाविद्यालयाचा सौरभ काशिनाथ आंभोरकर या दोघांनी संयुक्तरित्या राखले. त्यांनी ६१२ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.१५ एवढी आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३४ महाविद्यालयातून १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार २४५ मुले तर २ हजार ९१३ मुलींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ४४९ मुले तर ८ हजार २९८ मुलींचा समावेश आहे. या निकालातही दिल्ली बोर्डाच्या निकालाप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. जाहीर झालेल्या निकालात ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के जिल्ह्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची १३४ विद्यालये आहेत. त्यापैकी फक्त सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात म्हसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय, सेवाग्राम मार्गावरील सुशील हिंमतसिंगका विद्यालय, पुलगाव येथील लेबर कॅम्प सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स विद्यालय, पुलगाव येथील सेंट जॉन, होली फेथ ज्युनिअर कॉलेज व सेलू येथील दिपचंद चौधरी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा समावेश आहे. पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३३.३६ टक्के जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुनरपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८, कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६, वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.