शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

यश खासबागे जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

१८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान यशवंत महाविद्यालय वर्धाच्या यश चंद्रशेखर खासबागे याने पटकाविला. त्याने ९४.९२ टक्के गुण घेतले. तर द्वितीय स्थानी दोन विद्यार्थिनी राहिल्या. यात गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची निकीता द्वारकाप्रसाद पांडे व यशवंत महाविद्यालयाची साक्षी राजेंद्र कुळकर्णी यांचा समावेश आहे. या दोघींनीही ६१३ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.३० एवढी आहे. तृतीय स्थानही गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची वृशाली विजय मसने व हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. महाविद्यालयाचा सौरभ काशिनाथ आंभोरकर या दोघांनी संयुक्तरित्या राखले. त्यांनी ६१२ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.१५ एवढी आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३४ महाविद्यालयातून १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार २४५ मुले तर २ हजार ९१३ मुलींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ४४९ मुले तर ८ हजार २९८ मुलींचा समावेश आहे. या निकालातही दिल्ली बोर्डाच्या निकालाप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. जाहीर झालेल्या निकालात ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के जिल्ह्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची १३४ विद्यालये आहेत. त्यापैकी फक्त सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात म्हसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय, सेवाग्राम मार्गावरील सुशील हिंमतसिंगका विद्यालय, पुलगाव येथील लेबर कॅम्प सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स विद्यालय, पुलगाव येथील सेंट जॉन, होली फेथ ज्युनिअर कॉलेज व सेलू येथील दिपचंद चौधरी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा समावेश आहे. पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३३.३६ टक्के जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुनरपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८, कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६, वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.