शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

यश खासबागे जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

१८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान यशवंत महाविद्यालय वर्धाच्या यश चंद्रशेखर खासबागे याने पटकाविला. त्याने ९४.९२ टक्के गुण घेतले. तर द्वितीय स्थानी दोन विद्यार्थिनी राहिल्या. यात गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची निकीता द्वारकाप्रसाद पांडे व यशवंत महाविद्यालयाची साक्षी राजेंद्र कुळकर्णी यांचा समावेश आहे. या दोघींनीही ६१३ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.३० एवढी आहे. तृतीय स्थानही गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची वृशाली विजय मसने व हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. महाविद्यालयाचा सौरभ काशिनाथ आंभोरकर या दोघांनी संयुक्तरित्या राखले. त्यांनी ६१२ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.१५ एवढी आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३४ महाविद्यालयातून १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार २४५ मुले तर २ हजार ९१३ मुलींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ४४९ मुले तर ८ हजार २९८ मुलींचा समावेश आहे. या निकालातही दिल्ली बोर्डाच्या निकालाप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. जाहीर झालेल्या निकालात ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के जिल्ह्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची १३४ विद्यालये आहेत. त्यापैकी फक्त सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात म्हसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय, सेवाग्राम मार्गावरील सुशील हिंमतसिंगका विद्यालय, पुलगाव येथील लेबर कॅम्प सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स विद्यालय, पुलगाव येथील सेंट जॉन, होली फेथ ज्युनिअर कॉलेज व सेलू येथील दिपचंद चौधरी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा समावेश आहे. पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३३.३६ टक्के जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुनरपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८, कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६, वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.