शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

जगाला बापूंच्या सिद्धांताची गरज

By admin | Updated: January 31, 2016 02:17 IST

महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिनी बापूकुटीत आल्याने मी पावन झालो. सरकारला काही विकायचे असेल तर गांधीजींचा फक्त ब्रॅड म्हणून वापर करतात.

राजेंद्रसिंह : सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमातून आदरांजलीवर्धा : महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिनी बापूकुटीत आल्याने मी पावन झालो. सरकारला काही विकायचे असेल तर गांधीजींचा फक्त ब्रॅड म्हणून वापर करतात. मी बापूंना दहावीत असताना वाचले; परंतु त्यांची प्रतिकृती बनून मला एका अशिक्षित शेतकऱ्याने पाण्याच्या संरक्षणाची शिकवण दिली. आज जर बापू असते तर त्यांनी चरख्या ऐवजी पाणी वाचविण्याची शिकवण दिली असती. आज प्लास्टिकच्या बाटलीत २० रुपयांत पाणी मिळते. बापूंना माननारे लोक कमी होत आहे. परंतु त्यांचे सिद्धांत कधीच कमी होणार नाही. आजचा दिवस दु:खाचा नसून प्रेरणेचा आहे. विश्वाला पुढे पाउल ठेवण्याकरिता बापूंच्या सिद्धांताची गरज जलपुरूष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. सेवाग्राम आश्रमात बापुंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुनीलकुमार लवटे यांनी १९७२ मध्ये सेवाग्राम भेटीचा उल्लेख केला. आचार्य विनोबा भावे व इंदिरा गांधी भेटीचा संवाद सांगितला. महात्मा गांधी फक्त भारताचे नाही तर विश्वाचे आहेत. दुर्देव आहे आज सरकारी नोकरी करणाऱ्यांना ५० हजारांची सेवानिवृत्ती मिळते आणि शेतकऱ्याला काहीच नाही. भरत महोदय यांनी कुमारप्पा यांची माहिती दिली. संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम जाधव मानले. यावेळी अनेकांना येथे येत बापूंना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)