शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:24 IST

भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्राची मंजुरीमहाराष्ट्रातून सहा रेल्वेस्थानकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. या सहा रेल्वेस्थानकांच्या यादीत वर्धा रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याची माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी दिली.केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या अधिकृत शासकीय ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शिवाजी नगर (पुणे), लोणावळा, इगतपूरी, सोलापूर, पुणे व वर्धा या रेल्वेस्थानकांची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. वर्धा रेल्वे स्थानकाचा विकास म्हणजे अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्याने भविष्यात अनेक लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबू शकतात. तसेच वर्धा रेल्वे स्थानकावरुन अनेक प्रवासी रेल्वे गाड्या प्रारंभ होण्याकरिता निश्चितच मदत होईल. वर्धा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास तसेच जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र निर्माण करताना तंत्रज्ञान, स्थानिक संस्कृती व ऐतिहासिक महत्त्व या प्रमुख तत्वांवर वर्धा रेल्वेस्थानकाची निर्मिती प्रस्तावित आहे. वर्धा रेल्वेस्थानकाच्या या विकास कार्याकरिता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून झोनल रेल्वे (मध्य रेल्वे) यांना अधिकृत करण्यात आल्याची माहिती यावेळी खासदार तडस यांनी दिली. वर्धा रेल्वेस्थानकाची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर खासदार तडस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेलभवन, दिल्ली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे