शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

वर्धेच्या सभोवताल रेल्वे लाइन विस्तारासाठी कामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

वर्धा-नागपूर प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा बुटीबोरी-सिंदी (१९ किमी) विभाग कार्यान्वित झाला आहे आणि उपलब्ध जमिनीत उर्वरित लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा-भुसावळ (३१३ किमी) वर्धा ते भुसावळ या तिसऱ्या लाइनच्या कामाचा समावेश शासनाच्या आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   वर्धा ते नागपूर, वर्धा ते भुसावळ आणि सेवाग्राम ते बल्लारशाह असा तिसरा आणि चौथ्या रेल्वे मार्गाबाबत प्रकल्पाची प्रगती आणि आतापर्यंत या प्रकल्पासाठी निधी वाटप तपशील, तसेच रेल्वे मार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत  खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये तारांकित प्रश्न संख्या २४० अंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले  की, वर्धा-नागपूर ३ री लाइन (७६ किमी)  २०१२-१३ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ५४० कोटी आहे. मार्च २०२१ पर्यंत रु. ३६२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. ४६ कोटींचा परिव्यय प्रदान करण्यात आला आहे. वर्धा-नागपूर ४ थी लाईन (७९ किमी) २०१६-१७ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ६३८ कोटी आहे. मार्च, २०२१ पर्यंत रु.२४८ कोटींचा खर्च झाला आहे आणि२०२१-२२ साठी रु. १४८ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा-नागपूर तिसऱ्या आणि चैथ्या मार्गासाठी ४१ हेक्टर जमिनीपैकी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.  वर्धा-नागपूर प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा बुटीबोरी-सिंदी (१९ किमी) विभाग कार्यान्वित झाला आहे आणि उपलब्ध जमिनीत उर्वरित लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा-भुसावळ (३१३ किमी) वर्धा ते भुसावळ या तिसऱ्या लाइनच्या कामाचा समावेश शासनाच्या आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.   वर्धा-नागपूर तिसरी लाइन व चौथी लाइन, वर्धा-भुसावळ ३ री लाइन व वर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे खा. तडस यांनी म्हटले आहे.अनेक प्रकल्पाला सन २०१५-१६ खऱ्या अर्थाने प्रारंभ व गती प्रदान झाली आहे. काही प्रकल्प पूर्ण करीत असताना राज्य सरकारकडून जलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे.  केंद्र सरकार हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे, जिल्ह्याशी संबधीत हे तीनही प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. 

राज्य सरकारमुळे काम रखडले 

nवर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन (१३२  किमी)२०१५-१६ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. १२७२ कोटी आहे. मार्च,२०२१ पर्यंत रु. ४३२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. १४६ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. १३० हेक्टर जमिनीपैकी ६६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उपलब्ध जागेत मातीकाम, मोठे पूल व किरकोळ पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणताही रेल्वे प्रकल्प पूर्ण करणे हे राज्य सरकारकडूनजलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी, प्रकल्पाचे प्राधान्य, उल्लंघन करणाऱ्या युटिलिटीजचे स्थलांतर, विविध प्राधिकरणांकडून वैधानिक मंजुरी, भूगर्भीय आणि भौगोलिक परिस्थिती यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. प्रकल्पाच्या जागेचे क्षेत्रफळ, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती इ. हे सर्व घटक प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेळेवर परिणाम करतात. यामुळे प्रकल्पाचे पूर्ण होण्याची पुष्टी केलेली वेळ निश्चित केली जाऊ शकत नाही. तरीही प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न केले जात आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे