शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेच्या सभोवताल रेल्वे लाइन विस्तारासाठी कामे प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

वर्धा-नागपूर प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा बुटीबोरी-सिंदी (१९ किमी) विभाग कार्यान्वित झाला आहे आणि उपलब्ध जमिनीत उर्वरित लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा-भुसावळ (३१३ किमी) वर्धा ते भुसावळ या तिसऱ्या लाइनच्या कामाचा समावेश शासनाच्या आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :   वर्धा ते नागपूर, वर्धा ते भुसावळ आणि सेवाग्राम ते बल्लारशाह असा तिसरा आणि चौथ्या रेल्वे मार्गाबाबत प्रकल्पाची प्रगती आणि आतापर्यंत या प्रकल्पासाठी निधी वाटप तपशील, तसेच रेल्वे मार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत  खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये तारांकित प्रश्न संख्या २४० अंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले  की, वर्धा-नागपूर ३ री लाइन (७६ किमी)  २०१२-१३ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ५४० कोटी आहे. मार्च २०२१ पर्यंत रु. ३६२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. ४६ कोटींचा परिव्यय प्रदान करण्यात आला आहे. वर्धा-नागपूर ४ थी लाईन (७९ किमी) २०१६-१७ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. ६३८ कोटी आहे. मार्च, २०२१ पर्यंत रु.२४८ कोटींचा खर्च झाला आहे आणि२०२१-२२ साठी रु. १४८ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा-नागपूर तिसऱ्या आणि चैथ्या मार्गासाठी ४१ हेक्टर जमिनीपैकी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.  वर्धा-नागपूर प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा बुटीबोरी-सिंदी (१९ किमी) विभाग कार्यान्वित झाला आहे आणि उपलब्ध जमिनीत उर्वरित लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा-भुसावळ (३१३ किमी) वर्धा ते भुसावळ या तिसऱ्या लाइनच्या कामाचा समावेश शासनाच्या आवश्यक मान्यतेच्या अधीन राहून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.   वर्धा-नागपूर तिसरी लाइन व चौथी लाइन, वर्धा-भुसावळ ३ री लाइन व वर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन रेल्वे प्रकल्प कालबद्ध वेळेत पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे खा. तडस यांनी म्हटले आहे.अनेक प्रकल्पाला सन २०१५-१६ खऱ्या अर्थाने प्रारंभ व गती प्रदान झाली आहे. काही प्रकल्प पूर्ण करीत असताना राज्य सरकारकडून जलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास अडचण निर्माण होत आहे.  केंद्र सरकार हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे, जिल्ह्याशी संबधीत हे तीनही प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. 

राज्य सरकारमुळे काम रखडले 

nवर्धा-बल्लारशाह तिसरी लाइन (१३२  किमी)२०१५-१६ मध्ये मंजूर प्रकल्प. प्रकल्पाची अपेक्षित किंमत रु. १२७२ कोटी आहे. मार्च,२०२१ पर्यंत रु. ४३२ कोटींचा खर्च झाला आहे आणि २०२१-२२ साठी रु. १४६ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. १३० हेक्टर जमिनीपैकी ६६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उपलब्ध जागेत मातीकाम, मोठे पूल व किरकोळ पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणताही रेल्वे प्रकल्प पूर्ण करणे हे राज्य सरकारकडूनजलद भूसंपादन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वन मंजुरी, प्रकल्पाचे प्राधान्य, उल्लंघन करणाऱ्या युटिलिटीजचे स्थलांतर, विविध प्राधिकरणांकडून वैधानिक मंजुरी, भूगर्भीय आणि भौगोलिक परिस्थिती यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. प्रकल्पाच्या जागेचे क्षेत्रफळ, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती इ. हे सर्व घटक प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेळेवर परिणाम करतात. यामुळे प्रकल्पाचे पूर्ण होण्याची पुष्टी केलेली वेळ निश्चित केली जाऊ शकत नाही. तरीही प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न केले जात आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे