शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
2
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
3
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
4
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
5
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
6
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
7
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
8
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
9
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
10
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
11
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
12
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
13
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
14
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
15
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
16
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
17
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
18
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
19
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
20
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निधीअभावी रखडले तब्बल 22 ग्रामीण रस्त्यांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत  ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परिणामी या २२ मार्गांवरून वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी-विनोबांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे पूर्णत्त्वास जात असले तरी याच जिल्ह्याला शासनाकडून मुबलक आणि वेळीच निधी मिळत नसल्याने आता ग्रामीण रस्ते गुळगुळीत होण्याच्या कामालाच ब्रेक लागला आहे. मागील पाच वर्षांत विविध योजनांतर्गत एकूण ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, निधीअभावी तब्बल २२ ग्रामीण रस्त्यांचे कामच रेंगाळे असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाच वर्षांत विविध योजनांतर्गत  ९९ ग्रामसडक निर्मितीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ७७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी निधीअभावी तब्बल २२ रस्त्यांच्या कामाचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. परिणामी या २२ मार्गांवरून वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कोविड संकट काळात शासनाच्या अनेक योजनांच्या निधीला राज्य शासनाकडून कात्रीच लावण्यात आली होती. शिवाय आरोग्य विषयक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला हाेता. यामुळेही ही कामे रखडल्याचे सांगण्यात आले.

९९ कामांना मिळाली मंजुरी-   ग्रामीण भागातील दळण-वळण सोयीस्कर व्हावे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गुळगुळीत रस्त्यांची सोय व्हावी, या हेतूने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच जिल्हा वार्षिक निधीतून ९९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मुदत वाढीसाठी पाठविला प्रस्ताव-   आर्थिक वर्ष २०१७-१९ या वर्षातील २२ कामे अद्याप अपूर्ण आहेत. मुदत संपल्याने वाढीव मुदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे लागला ब्रेक-   कोरोना काळात येळाकेळी येथील स्टोन क्रशर मशीन सील करण्यात आली. त्यामुळे कामात वापरण्यात येणारी गिट्टी मिळत नव्हती. वेळीच वाळू घाटाचे लिलाव न झाल्याने वाळूचा तुटवडा पडला होता. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याबाहेरील मजूर आपल्या मूळ गावी परतले. यांसह कोरोनामुळे या कामांना ब्रेक लागल्याचे सांगण्यात येते.

शहर विकासासाठी करोडो रुपया खर्च केला जातो. मात्र, ग्रामीण भागाचा आम्ही विकास करू, अशी राजकीय पुढाऱ्यांची आश्वासने नेहमीच फोल ठरतात. ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून मुबलक निधी खेचून आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले पाहिजे.- निलकमल आखूड, सोनेगाव (बाई).

टॅग्स :Sewagramसेवाग्राम