शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

कोल्ही-ढिवरी रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:57 IST

गावे शहरांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेला आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, असे नाव दिले आहे. योजनेचा उद्देश चांगला असला तरी काही काळापासून ती कुरणच ठरत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावे शहरांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेला आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, असे नाव दिले आहे. योजनेचा उद्देश चांगला असला तरी काही काळापासून ती कुरणच ठरत आहे. ग्रामीण भाग शहरांशी जुळतोय; पण रस्त्यांची कामे दर्जाहीन होत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. कोल्ही (खेकडी) ते ढिवरी (हिवरा) रस्ता तर ‘पूढे पाठ, मागे सपाट’ आहे. समोरचे काम सुरू असताना मागील रस्ता हातानेही उखरतो. यामुळे असंतोष असून दर्जदार रस्ता निर्मितीची मागणी होत आहे.हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले जात आहे. या मार्गावर ७३ लाख ८६ हजार रुपयांच्या निधी खर्चाची तरतूद आहे; पण एका दिवसातच रस्त्याने आपली लायकी दाखविल्याने बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, योजनेचे अभियंता, जि.प. अध्यक्ष व अधीक्षक कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.वर्धा-चंद्रपूर व यवतमाळ या तीनही जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या कोल्ही (खेकडी) या गावातून मुख्य बाजारपेठ वा शहराच्या ठिकाणी येण्यासाठी ४० किमीचा प्रवास करावा लागतो. यामुळे गाव तेथे रस्ता व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ७३ लाख ८६ हजार रुपये खर्चून (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) पर्यंतचा १.५१ किमी लांब रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी १.३९० किमी रस्त्याचे डांबरीकरण तर उर्वरित ०.१२ किमी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. या रस्त्याचे भूमिपूजन ३० एप्रिल रोजी झाले. सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे; पण हे काम निकृष्ट असून हातानेही रस्त्यावरील डांबर उखरले जाते. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कंत्राटदाराकडून निकृष्ट बांधकाम केले जात असून ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तर दिली. यामुळे रस्त्याची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी व मजबूत रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्हाधिकाºयांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी अधीक्षक अधिकारी, जि.प. अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनावर सरपंच मंजूषा लडके, शाकेत डंभारे, दिनेश लढी, सचिन गुणवंत राऊत, दशरथ तिजारे, गजानन रोहणकर, संजय चौधरी, रवींद्र लढी, ज्ञानेश्वर पोते, प्रमोद पुनवटकर, विजय केशव ब्राह्मणवाडे, गुरूदेव बैलमारे, अमित सातपुते यांच्यासह ५३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणकोल्ही (खेकडी) ते ढिवरी (पिपरी) या रस्त्याचे कंत्राट देवळी येथील एका कंत्राटदाराकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंत्राटदाराने रस्त्याची रूंदीही कमी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे खोदकाम केले. हे खोदकाम करीत असताना शेतकºयांच्या बांधावर खोदून त्यातील माती व मुरूम रस्त्याच्या बांधकामात वापरला आहे. यामुळे लगतच्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण ग्रामस्थ उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.बहिष्कारानंतर मिळाला रस्तातीन जिल्ह्यांच्या सिमेवरील कोल्ही (खेकडी) गावात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. प्रारंभी या गावापर्यंत रस्ता नसल्याने ग्रामस्थांना खडतर प्रवास करावा लागत होता. एका व्यक्तीला सर्पदंश झाल्यावर रस्त्याअभावी रुग्णालयात पोहोचायला उशिर झाला. यामुळे त्याला जीव गमवावा लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तेव्हा २००१ मध्ये रस्ता झाला; पण तेव्हापासून दुर्लक्ष होते. आता १७ वर्षांनी डांबरीकरण होत असताना कंत्राटदार निकृष्ट काम करीत आहे. यामुळे पुन्हा बहिष्कार टाकावा काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.