शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनावर ग्रामसेवक कामावर

By admin | Updated: March 6, 2016 02:13 IST

गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : ग्रामसेवक दुपारपासून कार्यस्थळी रूजू वर्धा : गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती. यात शनिवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजय मीणा यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांशी चर्चा झाली. या चर्चेत शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय नियमानुसार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावर ग्रामसवेकांनी आंदोलन मागे घेतले असून दुपारपर्यंत आपापल्या कार्यस्थळी रूजू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी दिली.ग्रामसेवकांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हातील सर्वच ग्रामपंचायतीची कामे खोळंबली होती. याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यांना शुक्रवारपासून कामावर रूजू होण्याच्या सूचना असताना तीन ग्रामसवेक वगळता कुणीही कामावर गेले नाही. यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सीईओ यांच्यासह आंदोलन मंडपाला भेट दिली. येथे त्यांनी सर्वसामान्यांना या आंदोलनाचा त्रास होत असल्याचे म्हणत आंदोलन मागे घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सांगितले.यावर ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या मागण्या त्यांच्या समक्ष ठेवल्या. यातील होणारी कारवाई जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासकीय पद्धतीने करावी, ही मागणी मान्य केली. शिवाय शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय पद्धतीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावर ग्रामसेवकांनी त्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी सीइओ मीणा यांना दिले. त्यांनीही ग्रामसेवकांवरील वेतन कपातीची कारवाई मागे घेण्यात येत असल्याचे मान्य केल्याचे संघटनेने सांगितले. तर या बाबीला सीईओ मीणा यांनी दुजोरा दिला.(प्रतिनिधी)