शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:12 AM

विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना त्रास : कामाला गती देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर समस्येकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत थंडबस्त्यात पडलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.सदर पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात नियोजन करण्यात आले. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु, सध्या स्थितीत नाल्यावरील सदर पुलाचे काम ठप्प पडले आहे. इतकेच नव्हे तर या पुलाला अद्यापही संरक्षण कठडे न बसविण्यात आल्याने एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे.इतकेच नव्हे तर पुलावर डांबरीकरण सुद्धा करण्यात आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ये-जा करणाºयांना चिखल तुडवतच पुढील प्रवास करावा लागत असल्याने दोन वर्षांपासूनचे रखडलेल्या या पुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.सर्वत्र असतो चिखलपुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती असून पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने चिखलातूनच वाट काढावी लागते. अनेकदा वाहनेही अनियंत्रित होतात. त्यामुळे अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यावरील पुलावर चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने साधे पाई ये-जा करणेही कठीण होते. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजचेचे आहे.