शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST

विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना त्रास : कामाला गती देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर समस्येकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत थंडबस्त्यात पडलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.सदर पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात नियोजन करण्यात आले. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु, सध्या स्थितीत नाल्यावरील सदर पुलाचे काम ठप्प पडले आहे. इतकेच नव्हे तर या पुलाला अद्यापही संरक्षण कठडे न बसविण्यात आल्याने एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे.इतकेच नव्हे तर पुलावर डांबरीकरण सुद्धा करण्यात आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ये-जा करणाºयांना चिखल तुडवतच पुढील प्रवास करावा लागत असल्याने दोन वर्षांपासूनचे रखडलेल्या या पुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.सर्वत्र असतो चिखलपुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती असून पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने चिखलातूनच वाट काढावी लागते. अनेकदा वाहनेही अनियंत्रित होतात. त्यामुळे अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यावरील पुलावर चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने साधे पाई ये-जा करणेही कठीण होते. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजचेचे आहे.