शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST

विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना त्रास : कामाला गती देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर समस्येकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत थंडबस्त्यात पडलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.सदर पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात नियोजन करण्यात आले. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु, सध्या स्थितीत नाल्यावरील सदर पुलाचे काम ठप्प पडले आहे. इतकेच नव्हे तर या पुलाला अद्यापही संरक्षण कठडे न बसविण्यात आल्याने एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे.इतकेच नव्हे तर पुलावर डांबरीकरण सुद्धा करण्यात आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ये-जा करणाºयांना चिखल तुडवतच पुढील प्रवास करावा लागत असल्याने दोन वर्षांपासूनचे रखडलेल्या या पुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.सर्वत्र असतो चिखलपुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती असून पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने चिखलातूनच वाट काढावी लागते. अनेकदा वाहनेही अनियंत्रित होतात. त्यामुळे अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यावरील पुलावर चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने साधे पाई ये-जा करणेही कठीण होते. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजचेचे आहे.