शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

५०१ ग्रामपंचायतींनी जलसंधारणासाठी घेतला श्रमदानाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:35 IST

जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या पत्राचेही झाले वाचन : जलसंवर्धनासाठी उभी होणार लोकचळवळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील तब्बल ५०१ ग्रा.पं.मध्ये महिन्याच्या चौथा शनिवार असतानाही ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये जलसंधारणासाठी श्रमदानाचा ठराव एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी एक मोठी लोकचळवळच उभी होऊ पाहत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने संवर्धन कसे करता येईल, शिवाय नागरिकांना ‘जल ही जीवन है’ हे पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय याच ग्रामसभांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करणे क्रमप्राप्त होते. वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं.पैकी ५०१ ग्रा.पं. मध्ये २२ जून या एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले आहे. तर उर्वरित १८ ग्रा.पं. मध्ये निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने ग्रामसभा होऊ शकल्या नाही.१८ ग्रा.पं. मध्ये आचारसंहितेचा परिणाम२२ जूनला पं.स. आष्टी अंतर्गत एक तर सेलू पं.स. अंतर्गत येणाºया १७ अशा एकूण १८ ग्रा.पं. मध्ये ग्रामपंचायतीची आचार संहिता लागू असल्याने या ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा होऊ शकली नाही.