शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच

By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST

ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय

वायगाव (नि.) : ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय मंजुरही करावे लागतात. मुख्य ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. एवढेच नाही तर ग्रामसभेमध्ये महिलांची उपस्थिती व सहभाग असणे आवश्यक आहे., असे असले तरी यासभा जिल्ह्यात होत नसल्याचे चित्र आहे. महिलांच्या महत्त्वाच्या समस्येवर व प्रश्नावर महिला ग्रामसभेत चर्चा करण्यात येते; मात्र येथील ग्राम पंचायतीमध्ये महिला ग्रामसभा फक्त कागदावर दाखविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. याकडे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या युगात बहुतांश क्षेत्रात महिला या पुरूषाच्या बरोबरीने काम  करीत आहेत. शिक्षण, राजकारण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले. असे असताना केवळ आरक्षण महत्त्वाचे नसून महिलांना स्वत: निर्णय घेण्याचे व स्वत:चे विचार माडण्याचे काम या महिलांना ग्रामसभेतून करण्याची संधी दिल्या गेली आहे व जे काही त्यांचे प्रश्न आहे ते महिला ग्रामसभेत ठेऊ शकतात. महिलाच्या ग्रामसभेत जे निर्णय घेण्यात येतात ते मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात येतात. त्यांच्या हितासाठी जी काही कामे करावयाची असतील ती ग्रामसभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार  मान्यता देवून याद्वारे महिलांना कार्य  करण्याची संधी प्राप्त होते; परंतु ग्रामविकासाच्या कामांत महिलांना मागे ठेवण्यात येत आहे.(वार्ताहर)