शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

महिला ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच

By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST

ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय

वायगाव (नि.) : ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय मंजुरही करावे लागतात. मुख्य ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. एवढेच नाही तर ग्रामसभेमध्ये महिलांची उपस्थिती व सहभाग असणे आवश्यक आहे., असे असले तरी यासभा जिल्ह्यात होत नसल्याचे चित्र आहे. महिलांच्या महत्त्वाच्या समस्येवर व प्रश्नावर महिला ग्रामसभेत चर्चा करण्यात येते; मात्र येथील ग्राम पंचायतीमध्ये महिला ग्रामसभा फक्त कागदावर दाखविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. याकडे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या युगात बहुतांश क्षेत्रात महिला या पुरूषाच्या बरोबरीने काम  करीत आहेत. शिक्षण, राजकारण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले. असे असताना केवळ आरक्षण महत्त्वाचे नसून महिलांना स्वत: निर्णय घेण्याचे व स्वत:चे विचार माडण्याचे काम या महिलांना ग्रामसभेतून करण्याची संधी दिल्या गेली आहे व जे काही त्यांचे प्रश्न आहे ते महिला ग्रामसभेत ठेऊ शकतात. महिलाच्या ग्रामसभेत जे निर्णय घेण्यात येतात ते मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात येतात. त्यांच्या हितासाठी जी काही कामे करावयाची असतील ती ग्रामसभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार  मान्यता देवून याद्वारे महिलांना कार्य  करण्याची संधी प्राप्त होते; परंतु ग्रामविकासाच्या कामांत महिलांना मागे ठेवण्यात येत आहे.(वार्ताहर)