शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Updated: May 21, 2017 01:00 IST

गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे.

आठ दिवसांपासून नळ नाही : सरपंचाच्या उत्तराने महिला आक्रमक लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती पावडे यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया सरपंच व उपसरपंचांना सुनावल्या. त्यावेळी सरपंचांनी विद्युत पुरवठा नियमित नसणे, विद्युत मोटार जळणे, अशी नेहमीची रडगाणी ऐकवत हतबलता व्यक्त केली. येथील पाणी पुरवठा योजना वर्धा नदीवरुन आहे. नदीला पाणी आहे; पण वारंवार पाण्याचा पंप जळणे, मोटारची पर्यायी व्यवस्था न करणे तसेच पाण्याचे वाटप समप्रमाणात करण्याच्या नियोजनाच्या अभावाने गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी शेतमजूर व गोपालक पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. रोहण्यातील काही वॉर्डात आठ ते दहा दिवसांपासून नळ आलेले नसताना सरपंचाच्या घराच्या लाईनवरील नळांना दररोज पाणी कसे येते, असा संतप्त सवाल महिलांनी सरपंचासमोर उभा केला. यावर सरपंचाने माझे घर खोलगट भागात आहे, असे सांगताच महिला आणखीच भडकल्या. आठ दिवसांपूर्वी जळालेली मोटार चालू करताच पुन्हा जळाली असेल तर पर्यायी मोटारची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपचांयतीची आहे, असे महिलांनी यावेळी विचारले. यावर सरपंचांनी तुमच्या शेतातली मोटार जळाल्यावर आठ-दहा दिवस तुमचे ओलीत थांबते की नाही, असे उर्मट उत्तर दिल्याने महिला पुन्हा आक्रमक झाल्या. एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासन विद्युत पुरवठ्याच्या भारनियमना आड स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.