शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Updated: May 21, 2017 01:00 IST

गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे.

आठ दिवसांपासून नळ नाही : सरपंचाच्या उत्तराने महिला आक्रमक लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती पावडे यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया सरपंच व उपसरपंचांना सुनावल्या. त्यावेळी सरपंचांनी विद्युत पुरवठा नियमित नसणे, विद्युत मोटार जळणे, अशी नेहमीची रडगाणी ऐकवत हतबलता व्यक्त केली. येथील पाणी पुरवठा योजना वर्धा नदीवरुन आहे. नदीला पाणी आहे; पण वारंवार पाण्याचा पंप जळणे, मोटारची पर्यायी व्यवस्था न करणे तसेच पाण्याचे वाटप समप्रमाणात करण्याच्या नियोजनाच्या अभावाने गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी शेतमजूर व गोपालक पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. रोहण्यातील काही वॉर्डात आठ ते दहा दिवसांपासून नळ आलेले नसताना सरपंचाच्या घराच्या लाईनवरील नळांना दररोज पाणी कसे येते, असा संतप्त सवाल महिलांनी सरपंचासमोर उभा केला. यावर सरपंचाने माझे घर खोलगट भागात आहे, असे सांगताच महिला आणखीच भडकल्या. आठ दिवसांपूर्वी जळालेली मोटार चालू करताच पुन्हा जळाली असेल तर पर्यायी मोटारची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपचांयतीची आहे, असे महिलांनी यावेळी विचारले. यावर सरपंचांनी तुमच्या शेतातली मोटार जळाल्यावर आठ-दहा दिवस तुमचे ओलीत थांबते की नाही, असे उर्मट उत्तर दिल्याने महिला पुन्हा आक्रमक झाल्या. एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासन विद्युत पुरवठ्याच्या भारनियमना आड स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.