शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंगावर वीज कोसळून महिला ठार; अचानक दुपारी वीज कोसळली

By रवींद्र चांदेकर | Updated: August 18, 2024 20:54 IST

याप्रकरणी सुमंत पांगूळ यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली.

वडनेर (वर्धा) : हिंगणघाट तालुक्यातील कुटकी शेतशिवारात अंगावर वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास घडली. अश्विनी नामदेव पांगुळ (३५), असे मृत महिलेचे नाव.

वडनेर नजीकच्या कुटकी शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी अश्विनी पांगूळ, त्यांचे पती नामदेव, सुमंत पांगूळ व त्यांची पत्नी निकीता, ही मंडळी शेतात काम करीत होती. सुमंत फवारणी करीत होते, तर नामदेव डवरण करीत होते. अश्विनी, निकीता आदी शेतातील गवताचे पुंजाणे गोळा करीत होते. अचानक दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास अश्विनी पांगूळ यांच्या अंगावर वीज कोसळली. विजेच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी सुमंत पांगूळ यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या मार्गदर्शनात रीना कावडे, सचिन रोकडे पुढील तपास करीत आहे.