शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोन घटना : अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/हिंगणघाट : जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट शहरात मामानेच अल्पवयीन भाच्यावर तर सेलू तालुक्यातील बोरधरण येथे लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला. एकाच दिवशी अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. तर बोरधरण येथील घटनेत माहूर येथील महिलेशी राहूल बोदे रा. सिंदी(रेल्वे) यांची मोबाईलवरुन तीन वर्षांपूर्वी मैत्री झाली. दोघांमध्ये भेटीगाठी सुरु झाल्याने त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध प्रस्तापित झाले. पीडिता पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांसह वणी येथे किरायाने राहतात. राहुल याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बोरधरण येथील एका हॉटेलमध्ये बोलावित होता. याच हॉटेलमध्ये त्याने ७ डिसेंबर, १४ डिसेंबर व ७ फेब्रुवारी रोजी बोलावून अत्याचार केला. त्यानंतर महिलेने लग्नास गळ घातली असता राहूल बोदे यांनी टाळाटाळ सुरु केली. काही दिवसानंतर पीडितेने राहुलला फोन केला असता त्याने माझे लग्न झाले आता फोन करु नको, असे सांगितले. त्यामुळे पीडितेने राहुलचे घर गाठले असता त्याच्या घरच्यांनी तिला मारहाण करीत घराबाहेर काढले. त्यामुळे महिलेने सेलू पोलिसात तक्रारी असून पोलिसांनी राहुल बोदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तलाठ्याकडून मुलीचा विनयभंगकारंजा (घा.): तालुक्यातील धावसा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी तक्रारीअंती उघडकीस आली. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तलाठ्याला अटक केली आहे.सुखदेव गोविंद सावरकर (५०) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याने घरी कुणीही नसल्याची संधी पाहून १७ वर्षीय युवतीचा विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तलाठ्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट