शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:36 IST

शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनिर्मूलनासाठी टाकले मिठाचे पाणी : शासन, संघटनास्तरावर प्रयत्नांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या दुतर्फा, शेतशिवारात आजही मोठ्या प्रमाणात देशी आणि बहुगुणी झाडे आहेत. या झाडांमुळे ही जीवनसृष्टी सजीव असल्याचे दिसते. झाडांचे महत्त्व संत महात्म्यांपासून तर पर्यारणातज्ञांनी सांगितले आहे. पंजोबा, आजोबा, वडिलांनी लावलेली झाडे विस्तीर्ण वाढून आज शीतल छाया, शुद्ध हवा, फळे, लाकडे आदी देत आहेत. शासनदेखील रोडच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पूर्वी चुना आणि गेरू मारून संरक्षण देत होते. ही रंगविलेली झाडे रात्री वाहन चालकांना सावधान करण्याचे काम करीत होती. ती शेतकरी वाटसरू व गुरांसाठी विश्रामाची हक्काची जागा होती. आता विकासाच्या नादात या अजस्त्र झाडांची कत्तल केली जात आहे.वृक्षांचे महत्त्व पटल्याने झाडे लावण्यावर भर दिला जात आहे; पण त्या झाडांकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. वास्तविक, जुनी झाडे वाचविणे व त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या सेवाग्राम, वर्धा, कांढळी, नागपूर, जाम आदी मार्गांवरील झाडांना वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे बहुमूल्य झाडे वाळत आहे. यात कडूनिंब, आंबा या झाडांचा समावेश आहे. वाळवी जमिनीपासून झाडांना लागते. हळूहळू संपूर्ण झाड काबीज करून झाड वाळते. चुना व गेरू मारल्यास झाडांना वाळवी लागत नाही व आयुष्यही वाढते. वाळवी लागलेली झाडे शाबूत ठेवण्याकरिता तथा त्यांचे संगोपन करण्यासाठी शासन व सामाजिक स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.प्रत्येक वर्षी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. आता वृक्षांच्या संरक्षणावरही खर्च केला जात आहे; पण जुन्या झाडांच्या संगोपानाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी अजस्त्र वृक्ष कापले जात आहे. यावर तोडगा काढत झाडे न कापता विकास कामे करणे तथा वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.या करता येतात उपाययोजनावाळवी लागलेल्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण करण्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. काही ठिकाणी मीठ, कडूनिंबाच्या बिया, मोरचूद, शेण, गोमुत्र आदींचे वेगवेगळे द्रावण तयार करून ते झाडांवर शिंपडले जाते. याचा वाळवी लागलेल्या वृक्षांना फायदा होतो. शिवाय परसबाग तसेच काही वृक्षप्रेमी मीट व मिठाच्या द्रावणाचा उपयोग करतात, अशी माहिती आहे. महात्मा गांधी आश्रमातील गांधीजींनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाला किडे लागले होते. त्यावरही सदर प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला. शासन, सामाजिक संस्थांनी या दृष्टीने उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे.