शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:36 IST

शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनिर्मूलनासाठी टाकले मिठाचे पाणी : शासन, संघटनास्तरावर प्रयत्नांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या दुतर्फा, शेतशिवारात आजही मोठ्या प्रमाणात देशी आणि बहुगुणी झाडे आहेत. या झाडांमुळे ही जीवनसृष्टी सजीव असल्याचे दिसते. झाडांचे महत्त्व संत महात्म्यांपासून तर पर्यारणातज्ञांनी सांगितले आहे. पंजोबा, आजोबा, वडिलांनी लावलेली झाडे विस्तीर्ण वाढून आज शीतल छाया, शुद्ध हवा, फळे, लाकडे आदी देत आहेत. शासनदेखील रोडच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पूर्वी चुना आणि गेरू मारून संरक्षण देत होते. ही रंगविलेली झाडे रात्री वाहन चालकांना सावधान करण्याचे काम करीत होती. ती शेतकरी वाटसरू व गुरांसाठी विश्रामाची हक्काची जागा होती. आता विकासाच्या नादात या अजस्त्र झाडांची कत्तल केली जात आहे.वृक्षांचे महत्त्व पटल्याने झाडे लावण्यावर भर दिला जात आहे; पण त्या झाडांकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. वास्तविक, जुनी झाडे वाचविणे व त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या सेवाग्राम, वर्धा, कांढळी, नागपूर, जाम आदी मार्गांवरील झाडांना वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे बहुमूल्य झाडे वाळत आहे. यात कडूनिंब, आंबा या झाडांचा समावेश आहे. वाळवी जमिनीपासून झाडांना लागते. हळूहळू संपूर्ण झाड काबीज करून झाड वाळते. चुना व गेरू मारल्यास झाडांना वाळवी लागत नाही व आयुष्यही वाढते. वाळवी लागलेली झाडे शाबूत ठेवण्याकरिता तथा त्यांचे संगोपन करण्यासाठी शासन व सामाजिक स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.प्रत्येक वर्षी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. आता वृक्षांच्या संरक्षणावरही खर्च केला जात आहे; पण जुन्या झाडांच्या संगोपानाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी अजस्त्र वृक्ष कापले जात आहे. यावर तोडगा काढत झाडे न कापता विकास कामे करणे तथा वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.या करता येतात उपाययोजनावाळवी लागलेल्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण करण्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. काही ठिकाणी मीठ, कडूनिंबाच्या बिया, मोरचूद, शेण, गोमुत्र आदींचे वेगवेगळे द्रावण तयार करून ते झाडांवर शिंपडले जाते. याचा वाळवी लागलेल्या वृक्षांना फायदा होतो. शिवाय परसबाग तसेच काही वृक्षप्रेमी मीट व मिठाच्या द्रावणाचा उपयोग करतात, अशी माहिती आहे. महात्मा गांधी आश्रमातील गांधीजींनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाला किडे लागले होते. त्यावरही सदर प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला. शासन, सामाजिक संस्थांनी या दृष्टीने उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे.