शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

आधार लिंकशिवाय खत नाही

By admin | Updated: May 8, 2017 00:37 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे.

नोंदणीकृत खत विक्री केंद्रांत लागणार पॉस मशीन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे. यातच शासनाने कृषी केंद्रातून यंदा शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक केल्याशिवाय खत मिळणार नसल्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दुकानात जाताना आधार कार्ड घेवूनच जाणे बंधनकारक झाले आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाकडे एकूण ६०५ खत विक्रेत्यांची नोंदणी झाली. या सर्वच दुकानांत ही मशीन लागणार आहे. मशीन लावण्याच्या कामाला १५ मे पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच खत मिळेत असे संकेत आहे. या मशीनच्या वापरासंदर्भात कृषी विभाग आणि खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात देण्यात आले आहे. उर्वरीत व्यावसायिकांना येत्या १२ मे रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या पॉस मशीनची चर्चा असली तरी त्याच्या वापरावरून गोंधळ निर्माण झाला आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. वखरणी होताच खते आणि बियाण्याच्या खरेदीची शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. अशात या पॉस मशीनच्या गोंधळामुळे घोळाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. सबसिडीवर चाप खत विक्री करताना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सबसिडीचा घोळ होत होता. आता या घोळाला पॉस मशीनमुळे चाप बसणार आहे. या मशीनमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत खताची उचल होणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विक्री दाखवून सबसिडी उचलणाऱ्यांचे धाबे दणानले आहे. अनेकांकडून होते धूळपेरणी वर्धा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता येथील शेतकऱ्यांकडून धूळपेरणी करण्यात येते. या पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना खताची गरज भासणार आहे. अशा वेळी या पॉस मशीनमुळे त्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुबलक खत आणि बियाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीपात बियाण्याकरिता आणि खतांकरिता शेतकऱ्यांना भटकण्याची वेळ येणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या पेऱ्याला ७२ मेट्रीक टन खताची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. यापेक्षा अधिक खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मागणीच्या तुलनेत १.२८ मेट्रीक टन खत अतिरिक्त असल्याचे कृषी विभाकडून सांगण्यात आले आहे. कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कपाशी बियाण्यांच्या ९.८० लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्याला १६ लाख पाकिटे मिळणार आहे.