शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: March 31, 2017 01:48 IST

देशाला दिशा देण्याचे काम या वर्ध्यातून झाले आहे. वर्ध्यातूनच शेतकऱ्यांच्या हा कर्जमुक्तीचा लढा तीव्र करण्याचा इशारा

बापूकुटी व परमधाम आश्रमातून उर्जा घेत संघर्ष यात्रा रवानासेल : देशाला दिशा देण्याचे काम या वर्ध्यातून झाले आहे. वर्ध्यातूनच शेतकऱ्यांच्या हा कर्जमुक्तीचा लढा तीव्र करण्याचा इशारा गुरूवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. सेलू येथे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आ. रणजित कांबळे, सुनील केदार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, माजी आ. राजू तिमांडे, जि.प.चे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल ही नेतेमंडळी विराजमान होती. विखे पाटील पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करण्याचा आग्रह धरणाऱ्या आमदारांना भाजपा सरकारने निलंबित केले. अहमदाबाद मुंबई मेट्रो ट्रेनची राज्याला गरज नसताना त्यावर या सरकारने ७५ हजार कोटी रूपये खर्चाची तरतूद केली. देश सोडून पळालेल्या माल्ल्याचे ६ हजार कोटी, उद्योग पतीचे एक लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे तर अदानी, अंबानीसाठी काम करीत असल्याचा आरोपही विखे पाटलांनी केला. घोषणाचा पाऊस, स्वप्नांची मालिका उभी करायची आणि लोकांची मते मिळवायची हा धंदा केंद्र व राज्यात सुरू आहे. ‘मन की बात’ खूप झाली, आता ‘काम की बात’ करा, हे सांगण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. खा. अशोक चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर बँकाचा फायदा होईल, असे सुचक वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सावकारांचे भले केले. मुक्तीच्या नावाखाली हे सरकार सामान्य शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहे. उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजपा सरकारच्या विरोधात कुणीही बोलायचे नाही, आम्ही म्हणतो ते निमुटपणे सहन करा अन्यथा केसेस दाखल करू अशी निजामापेक्षाही हुकूमत गाजवत या सरकारचे काम सुरू आहे. काही झाले तरी आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.सेवाग्राम व पवनार आश्रमला भेटसकाळी संघर्ष यात्रा महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात दाखल झाली. बापूकुटीत प्रार्थना करुन आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील परमधाम आश्रमाला भेट दिली. यानंतर ही संघर्ष यात्रा सेलू येथे दाखल झाली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, राकॉचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किशोर माथनकर, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, रामभाऊ सातव यांच्यासहकाँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.