शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कृषी व्यावसायिकांवरील खत विक्री परवाना निलंबनाची कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

वर्धा शहरातील आंदोलनाचे नेतृत्व रवी शेंडे, मनोज भुतडा यांनी केले. भारतात खत वितरण प्रणाली सुरू झाली तेव्हा पहिल्या 15 जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळात कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना खत व बियाणे कमी पडू दिले नाही. पण ई-पॉशमशिनमध्ये शेतकऱ्यांचे अंगठे न घेता रासायनिक खताची विक्री करण्यात आल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता निलंबीत करण्यात आले.

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियमबाह्य पणे खताची विक्री केल्याचा ठपका ठेवून अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी निलंबीत केले. हा प्रकार कृषी व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकणारा ठरत असून कृषी विभागाने ही कारवाई वेळीच मागे घ्यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. जिल्हा कृषी व्यावसायी संघाने पुकारलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांच निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.वर्धा शहरातील आंदोलनाचे नेतृत्व रवी शेंडे, मनोज भुतडा यांनी केले. भारतात खत वितरण प्रणाली सुरू झाली तेव्हा पहिल्या 15 जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळात कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना खत व बियाणे कमी पडू दिले नाही. पण ई-पॉशमशिनमध्ये शेतकऱ्यांचे अंगठे न घेता रासायनिक खताची विक्री करण्यात आल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता निलंबीत करण्यात आले. ही कारवाई कृषी व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याने ती कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनात सुशील उमरे, श्रीकांत महाबुधे, राजेंद्र वंजारी, स्वप्निल राऊत, विनोद भूतडा, संदीप कुंभारे, संजय बोथरा, बाबाराव शिंदे, प्रफुल्ल देवतळै, दिलीप राठी, पद्माकर पाठे, नरेंद्र पाटील, शिरीष काशीकर आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने कृषी व्यावसायिकांच्या हितार्थ निर्णय घेत त्याची वेळीच अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवदेनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र