शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:47 IST

नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

ठळक मुद्देकामास प्रारंभ : खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.या महामार्गाचे कामही युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई दरम्यान ७२० कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी सेलू, वर्धा, आर्वी या तीन तालुक्यातून जमीन अधिग्रहन करण्यात आली आहे. सेलू तालुक्यात सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) या गावातून शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २७७.७८२ हेक्टर खासगी जमीन तर २९.५४ हेक्टर सरकारी जमीन अशी एकूण ३०७.२२७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.वर्धा तालुक्यात महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रज, झाडगाव, वाटोडा, धामणगाव, डोरली, लोनसावळी या दहा गावातून जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. २०६.१७२ हेक्टर आर खासगी जमीन तर ७१.७२ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात एकूण २७७.८९२ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यात बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या आठ गावातील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ११६.२२७ हेक्टर आर खासगी जमीन तर २३.६६ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात एकूण १३९.६४७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण झाली आहे. या मार्गावर सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट उभारला जाणार असून त्यांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.८८ टक्के काम पूर्णया महामार्गासाठी सेलू तालुक्यात ८२.९५ टक्के जमिनीचे खरेदी खत करून घेण्यात आले आहे. तर वर्धा तालुक्यात ८१.८४ टक्के जमिनीचे खरेदी खत झाले आहे. आर्वी तालुक्यात ८९.१८ टक्के जमिनीचे खरेदी खत तयार करण्यात आले आहे. तीन तालुक्यात १४ टक्के जमीन अधिग्रहणाचे काम बाकी राहिले आहे.