शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:47 IST

नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

ठळक मुद्देकामास प्रारंभ : खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.या महामार्गाचे कामही युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई दरम्यान ७२० कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी सेलू, वर्धा, आर्वी या तीन तालुक्यातून जमीन अधिग्रहन करण्यात आली आहे. सेलू तालुक्यात सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) या गावातून शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २७७.७८२ हेक्टर खासगी जमीन तर २९.५४ हेक्टर सरकारी जमीन अशी एकूण ३०७.२२७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.वर्धा तालुक्यात महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रज, झाडगाव, वाटोडा, धामणगाव, डोरली, लोनसावळी या दहा गावातून जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. २०६.१७२ हेक्टर आर खासगी जमीन तर ७१.७२ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात एकूण २७७.८९२ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यात बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या आठ गावातील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ११६.२२७ हेक्टर आर खासगी जमीन तर २३.६६ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात एकूण १३९.६४७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण झाली आहे. या मार्गावर सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट उभारला जाणार असून त्यांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.८८ टक्के काम पूर्णया महामार्गासाठी सेलू तालुक्यात ८२.९५ टक्के जमिनीचे खरेदी खत करून घेण्यात आले आहे. तर वर्धा तालुक्यात ८१.८४ टक्के जमिनीचे खरेदी खत झाले आहे. आर्वी तालुक्यात ८९.१८ टक्के जमिनीचे खरेदी खत तयार करण्यात आले आहे. तीन तालुक्यात १४ टक्के जमीन अधिग्रहणाचे काम बाकी राहिले आहे.