शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:47 IST

नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

ठळक मुद्देकामास प्रारंभ : खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.या महामार्गाचे कामही युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई दरम्यान ७२० कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी सेलू, वर्धा, आर्वी या तीन तालुक्यातून जमीन अधिग्रहन करण्यात आली आहे. सेलू तालुक्यात सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) या गावातून शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २७७.७८२ हेक्टर खासगी जमीन तर २९.५४ हेक्टर सरकारी जमीन अशी एकूण ३०७.२२७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.वर्धा तालुक्यात महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रज, झाडगाव, वाटोडा, धामणगाव, डोरली, लोनसावळी या दहा गावातून जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. २०६.१७२ हेक्टर आर खासगी जमीन तर ७१.७२ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात एकूण २७७.८९२ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यात बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या आठ गावातील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ११६.२२७ हेक्टर आर खासगी जमीन तर २३.६६ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात एकूण १३९.६४७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण झाली आहे. या मार्गावर सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट उभारला जाणार असून त्यांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.८८ टक्के काम पूर्णया महामार्गासाठी सेलू तालुक्यात ८२.९५ टक्के जमिनीचे खरेदी खत करून घेण्यात आले आहे. तर वर्धा तालुक्यात ८१.८४ टक्के जमिनीचे खरेदी खत झाले आहे. आर्वी तालुक्यात ८९.१८ टक्के जमिनीचे खरेदी खत तयार करण्यात आले आहे. तीन तालुक्यात १४ टक्के जमीन अधिग्रहणाचे काम बाकी राहिले आहे.