शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आमच्या अंगणात गाडी का लावलीस...कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही... ही आहेत कारण जीवघेण्या हल्ल्यामागची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 16:30 IST

Wardha News कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही...दारू पिण्यास पैस का देत नाही...अशा क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, चाकू हल्ले होत आहे.

ठळक मुद्दे६ महिन्यांत १७ खून, हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी झाली आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : तू माझ्याकडे कां बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस...आमच्या अंगणात तुझी गाडी का लावलीस...कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही...दारू पिण्यास पैस का देत नाही...अशा क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, चाकू हल्ले होत आहे. अगदी जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत तरुणाईची मजल गेली आहे. त्यामुळे ‘राग क्षणाचा अन् घात जिंदगीचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात १७ खुनाच्या घटना, तर १९ जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधीनतेमुळे तरुणाई आक्रमक होत चालल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याचे बोलल्या जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुलगाव शहरात दारूसाठी पैसे न दिल्याने युवकास रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तसेच देवळी शहरात खर्रा खाण्यावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. माझ्या घरासमोर कचरा का टाकला. या कारणातून तिघांनी एका महिलेस मारहाण केल्याची घटना आर्वी तालुक्यातील एका गावात घडली. दोन दिवसांपूर्वी शहरातील शास्त्री चौकात वडापाव देण्यास उशीर झाल्याने विक्रेत्याच्या छातीत कैची खूपसून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शहरातील चितोडा परिसरात क्षुल्लक कारणातून एका १९ वर्षीय युवकाला दोघांनी खून केला. जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे रोज एखाद्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यांत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असल्याचे चित्र आहे.

हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘व्यसनाधिनता’

बहुतांशवेळा हल्ल्यांमध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गुटखा, खर्रा, चरस, गांजा आदी विविध अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. क्षुल्लक कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचारतज्ज्ञांनीदेखील व्यक्त केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही विशेष कारवाई करण्याची गरज आहे. अनेक अशा प्रकरणांचा उलगडादेखील पोलिसांनी केला आहे. मात्र, काही विकृतांकडून आणि व्यसनाधिनांकडून असे हल्ले अजूनही सुरूच असल्याने पोलिसांचादेखील ताण वाढला आहे.

जिवलग मित्र, आई-वडिलांवरही प्राणघातक हल्ले

आजमितीस किरकोळ कारणातून झालेले मतभेद पुढे टोकाच्या निर्णयापर्यंत जात आहेत. किरकोळ कारणातून जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू बनत आहे. मित्रानेच मित्रावर खुनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खर्चासाठी पैसे दिले नाहीत, दारूसाठी पैसे दिले नाहीत, याचा मनात राग धरून चक्क आई-वडिलांवरही मुलांनी हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत. रागाच्या भरात पुढे कोण आहे याच जराही विचार न करता हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे.

संशोधनाची आज गरज

क्षुल्लक कारणावरून हाणामारीपासून ते अगदी प्राणघातक असे हल्ले होत आहेत. ‘अति राग आणि भीक माग’ अशी अवस्था अनेक वेळा हल्लेखोरांवर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. किरकोळ कारणावरून वाढत चाललेले हल्ले हा आज संशोधनाचा विषय बनला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी