शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आमच्या अंगणात गाडी का लावलीस...कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही... ही आहेत कारण जीवघेण्या हल्ल्यामागची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 16:30 IST

Wardha News कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही...दारू पिण्यास पैस का देत नाही...अशा क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, चाकू हल्ले होत आहे.

ठळक मुद्दे६ महिन्यांत १७ खून, हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी झाली आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : तू माझ्याकडे कां बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस...आमच्या अंगणात तुझी गाडी का लावलीस...कचरा का टाकला.. खर्रा का दिला नाही...दारू पिण्यास पैस का देत नाही...अशा क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, चाकू हल्ले होत आहे. अगदी जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत तरुणाईची मजल गेली आहे. त्यामुळे ‘राग क्षणाचा अन् घात जिंदगीचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात १७ खुनाच्या घटना, तर १९ जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधीनतेमुळे तरुणाई आक्रमक होत चालल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याचे बोलल्या जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुलगाव शहरात दारूसाठी पैसे न दिल्याने युवकास रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तसेच देवळी शहरात खर्रा खाण्यावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. माझ्या घरासमोर कचरा का टाकला. या कारणातून तिघांनी एका महिलेस मारहाण केल्याची घटना आर्वी तालुक्यातील एका गावात घडली. दोन दिवसांपूर्वी शहरातील शास्त्री चौकात वडापाव देण्यास उशीर झाल्याने विक्रेत्याच्या छातीत कैची खूपसून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शहरातील चितोडा परिसरात क्षुल्लक कारणातून एका १९ वर्षीय युवकाला दोघांनी खून केला. जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे रोज एखाद्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यांत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असल्याचे चित्र आहे.

हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘व्यसनाधिनता’

बहुतांशवेळा हल्ल्यांमध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गुटखा, खर्रा, चरस, गांजा आदी विविध अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. क्षुल्लक कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचारतज्ज्ञांनीदेखील व्यक्त केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही विशेष कारवाई करण्याची गरज आहे. अनेक अशा प्रकरणांचा उलगडादेखील पोलिसांनी केला आहे. मात्र, काही विकृतांकडून आणि व्यसनाधिनांकडून असे हल्ले अजूनही सुरूच असल्याने पोलिसांचादेखील ताण वाढला आहे.

जिवलग मित्र, आई-वडिलांवरही प्राणघातक हल्ले

आजमितीस किरकोळ कारणातून झालेले मतभेद पुढे टोकाच्या निर्णयापर्यंत जात आहेत. किरकोळ कारणातून जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू बनत आहे. मित्रानेच मित्रावर खुनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खर्चासाठी पैसे दिले नाहीत, दारूसाठी पैसे दिले नाहीत, याचा मनात राग धरून चक्क आई-वडिलांवरही मुलांनी हल्ले केल्याच्या घटना घडत आहेत. रागाच्या भरात पुढे कोण आहे याच जराही विचार न करता हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे.

संशोधनाची आज गरज

क्षुल्लक कारणावरून हाणामारीपासून ते अगदी प्राणघातक असे हल्ले होत आहेत. ‘अति राग आणि भीक माग’ अशी अवस्था अनेक वेळा हल्लेखोरांवर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. किरकोळ कारणावरून वाढत चाललेले हल्ले हा आज संशोधनाचा विषय बनला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी