शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रोडरोमिओंना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:07 IST

दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देधुनिवाले चौक, बॅचलर रोड : रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दादाजी धुनिवाले चौकापासून आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण पूर्णत्वास गेले आहे. मार्गाच्या दुतर्फा पादचाऱ्यांकरिता पदपथ (फुटपाथ) तयार करण्यात आला आहे. मात्र, हे पदपथ टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीने ताब्यात घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पदपथावरच अनेकांनी अतिक्रमण करीत व्यवसाय थाटले आहे. शिवाय, मार्गालगतच एक कॅफे असून येथेही प्रेमीयुगुलांची सायंकाळनंतर गर्दी उसळते. धुनिवाले चौकात पेट्रोलपंप परिसरात पानठेले व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचा घेत तरुणांकडून मद्याचे घोटही रिचविले जातात. येथेच युवकांचे टोळके रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करताना दिसून येतात. याचा मार्गाने ये-जा करणाऱ्यांसह रहिवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शिकवणी वर्गावरून येणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. याकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असून पोलिसांचा कारभार कारभार ढेपाळल्याने हा विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती, टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील रहिवासी नागरिक, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.महिनाभरापूर्वी झाला चाकूहल्लाधुनिवाले चौकात पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या पानठेल्यावर टोळक्यातील युवकांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला आणि त्याचे पर्यवसान युवकावर चाकूहल्ला करण्यात आले. यात युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, काही काळ चौकात भीतीचे वातावरण होते. पोलिस विभाग या घटनेपासूनही अनभिज्ञ दिसून आला.धुनिवाले चौकात अनेकांकडून खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पानठेले लावून पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या गाड्यांवर सायंकाळनंतर प्रचंड गर्दी उसळते. मात्र, ग्राहकांकडून वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज वाहतूक व्यवस्था कोलमडते. येथे अपघाताची शक्यताही बळावली आहे. याकडे वाहतूक नियंत्रक पोलिसांना कानाडोळा आहे.बेफाम वाहने पिटाळणाऱ्यांचा हैदोसधुनिवाले चौक ते आर्वी नाका रस्ता गुळगुळीत झाला आहे. याचा फायदा घेत युवकांकडून बेफाम वाहने पिटाळली जातात. हे चित्र येथे दररोजच पाहायला मिळते. याकडेही कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अपघाताची मोठी घटना घडण्याची भीयी नागरिकांनी व्यक्त केली आहे.चार्ली पथके गेली कुठे?काही वर्षांपूर्वी गुन्हेवारी वृत्तीवर वॉच ठेवण्याकरिता चार्ली पथके तयार करण्यात आली होती. शहरातील विविध भागात ही पथके गस्त घालत होती. ही पथकेही सद्यस्थितीत गुंडाळण्यात आली आहे. यामुळे असामाजिक प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाचा धाकच राहिलेला नसल्याने बॅचलर रोड परिसरात अनुचित घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी