शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पांढऱ्या सोन्याला येणार झळाळी; दर 10 हजारांवर पोहचण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : खरीप हंगामात महाराष्ट्रात पूर परिस्थिती, तसेच सततच्या पावसाने कापसाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही तेजी आली असून, कापूस लवकरच १० हजारांवर पोहोचणार असल्याचा अंदाज जाणकार व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्याने कापसाच्या भावात तेजी आली आहे. येत्या काही  दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन त्याचा भाव १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता व्यापारी वर्गात व्यक्त करण्यात येत आहे.

व्यापारी स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची-    कापसासोबत कापूस खरेदी करणाऱ्या फॅक्ट्रऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खरेदीत चांगलीच स्पर्धा आली. ही स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली. ज्या फॅक्ट्ररीत भावात तेजी, तसेच तेथील भाव शेतकऱ्यांना योग्य वाटला, तेथे त्याची आवक वाढली. त्यामुळे विविध फॅक्ट्ररीत कापसाची आवक वाढली. शेतमालाला तेजीचा भाव मिळू लागला. 

पांढरे सोने ठरले बाजारपेठेसाठी देवदूत

-    पुलगाव : कापूस एकाधिकार योजना अंमलात येऊन जवळपास ४० वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत २०२१ वर्ष शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यासाठी ऐतिहासिक ठरले. तरुणपणापासून म्हातारपण येईपर्यंत जो भाव शेतकऱ्यांनी पाहिला नव्हता, तो या वर्षी सुरुवातीच्या काळातच कापसाला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. -    मागील काही वर्षांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी दिवाळी साजरी करण्याचे पीक म्हणून ओळखले जायचे.  या पिकामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात आर्थिक अडचण दूर होऊन देवाण-घेवाणीचे व्यवहार चालत होते.  त्यामुळे सोयाबीन काही प्रमाणात विकून  शेतकरी आपल्या गरजा भागवून कापूस साठवून ठेवत होते, परंतु या वर्षी पहिल्यांदाच कापसाच्या भावाने मोठी मुसंडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी काही कापूस विकून दिवाळी साजरी केली. मिळालेल्या भावामुळे बाजारपेठेत आनंदाचे वातावरण आहे.-    आजच्या ऑनलाइनच्या युगात शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेतही दिसला व सणासुदीला दिसणारी गर्दी गायब झाली होती. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली ती ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लहान सोबत मोठे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पांढरे सोने बाजारपेठेसाठी देवदूत ठरल्याचे दिसून आले. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन मात्र, कमी असल्याने कापसाच्या भावात यंदा तेजी आली आहे. कापसाचे हे दर पाहता पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजारपेठेत आहे. -विनोद कोटेवार, सचिव, बाजार समिती, आर्वी.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड