शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

पांढऱ्या सोन्याला येणार झळाळी; दर 10 हजारांवर पोहचण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : खरीप हंगामात महाराष्ट्रात पूर परिस्थिती, तसेच सततच्या पावसाने कापसाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही तेजी आली असून, कापूस लवकरच १० हजारांवर पोहोचणार असल्याचा अंदाज जाणकार व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला प्रचंड मागणी असली, तरी त्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने खासगी व्यापारातच शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्यावरून स्पर्धा सुरू असल्याचे बाजारात दिसून येत आहे. सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्याने कापसाच्या भावात तेजी आली आहे. येत्या काही  दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन त्याचा भाव १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता व्यापारी वर्गात व्यक्त करण्यात येत आहे.

व्यापारी स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची-    कापसासोबत कापूस खरेदी करणाऱ्या फॅक्ट्रऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खरेदीत चांगलीच स्पर्धा आली. ही स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली. ज्या फॅक्ट्ररीत भावात तेजी, तसेच तेथील भाव शेतकऱ्यांना योग्य वाटला, तेथे त्याची आवक वाढली. त्यामुळे विविध फॅक्ट्ररीत कापसाची आवक वाढली. शेतमालाला तेजीचा भाव मिळू लागला. 

पांढरे सोने ठरले बाजारपेठेसाठी देवदूत

-    पुलगाव : कापूस एकाधिकार योजना अंमलात येऊन जवळपास ४० वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत २०२१ वर्ष शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यासाठी ऐतिहासिक ठरले. तरुणपणापासून म्हातारपण येईपर्यंत जो भाव शेतकऱ्यांनी पाहिला नव्हता, तो या वर्षी सुरुवातीच्या काळातच कापसाला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. -    मागील काही वर्षांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी दिवाळी साजरी करण्याचे पीक म्हणून ओळखले जायचे.  या पिकामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात आर्थिक अडचण दूर होऊन देवाण-घेवाणीचे व्यवहार चालत होते.  त्यामुळे सोयाबीन काही प्रमाणात विकून  शेतकरी आपल्या गरजा भागवून कापूस साठवून ठेवत होते, परंतु या वर्षी पहिल्यांदाच कापसाच्या भावाने मोठी मुसंडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी काही कापूस विकून दिवाळी साजरी केली. मिळालेल्या भावामुळे बाजारपेठेत आनंदाचे वातावरण आहे.-    आजच्या ऑनलाइनच्या युगात शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेतही दिसला व सणासुदीला दिसणारी गर्दी गायब झाली होती. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी झाली ती ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लहान सोबत मोठे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पांढरे सोने बाजारपेठेसाठी देवदूत ठरल्याचे दिसून आले. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन मात्र, कमी असल्याने कापसाच्या भावात यंदा तेजी आली आहे. कापसाचे हे दर पाहता पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजारपेठेत आहे. -विनोद कोटेवार, सचिव, बाजार समिती, आर्वी.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड