शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

पांढरे सोने करणार मालामाल; २.१५ लाख हेक्टरवर होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पिवळे सोने सध्या प्रतिग्रॅम ५ हजार १००च्या घरात असून, कधी नव्हे तितकी यंदा पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाच्या भावात तेजी आल्याचे वास्तव आहे. सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.४ लाख ३७ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांचा पेरा-   यंदाच्या खरीप हंगामात किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आर्वी तालुक्यात ४६ हजार ७९५ हेक्टर, आष्टी तालुक्यात २६ हजार ४२५ हेक्टर, देवळी तालुक्यात ५७ हजार ५८० हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ८१ हजार ४०५ हेक्टर, कारंजा तालुक्यात ४५ हजार ९५० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७३ हजार ४४० हेक्टर, सेलू तालुक्यात ४६ हजार ७४६ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ५८ हजार ८८० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज आहे.

७३,५५० हेक्टरवर होणार तूर लागवड- खरीप हंगामात ७३ हजार ५५० हेक्टर जमिनीवर तूर पिकाची लागवड होणार आहे. आर्वी तालुक्यात १०,७५० हेक्टर, आष्टी तालुक्यात ४ हजार हेक्टर, देवळी तालुक्यात ११ हजार हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १५,५०० हेक्टर, कारंजा तालुक्यात ८,५०० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ८ हजार हेक्टर, सेलू तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टर, तर वर्धा तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर यंदा तुरीची लागवड होणार आहे.

९० मेट्रीक टन खताची राहणार गरज-    विविध पिकांसाठी जिल्ह्याला ९० हजार मेट्रीक टन इतकी खतांची आवश्यकता भासणार आहे. खतांचा पुरवठा करताना आधी तो ग्रामीण भाग व रॅक पॉईंट पासून लांब असणाऱ्या गावांना करण्यात येणार आहे. -    प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे खतांचा पुरवठा न केल्यास किंवा परस्पर पुरवठा कमी जास्त केल्यास वाहतूकदारांवर अत्यावश्यक वस्तु कायाद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे तर त्याच्या पाठोपाठ सोयाबीन पिकाचे क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही गैरसोईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. शिवाय भरारी पथक सज्ज राहणार आहेत.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी, वर्धा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खत कोंडीला सामोरे जावे लागू नये अशा नियोजनाच्या आपण सूचना दिल्या आहेत.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड