शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने करणार मालामाल; २.१५ लाख हेक्टरवर होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पिवळे सोने सध्या प्रतिग्रॅम ५ हजार १००च्या घरात असून, कधी नव्हे तितकी यंदा पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाच्या भावात तेजी आल्याचे वास्तव आहे. सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.४ लाख ३७ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांचा पेरा-   यंदाच्या खरीप हंगामात किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आर्वी तालुक्यात ४६ हजार ७९५ हेक्टर, आष्टी तालुक्यात २६ हजार ४२५ हेक्टर, देवळी तालुक्यात ५७ हजार ५८० हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ८१ हजार ४०५ हेक्टर, कारंजा तालुक्यात ४५ हजार ९५० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७३ हजार ४४० हेक्टर, सेलू तालुक्यात ४६ हजार ७४६ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ५८ हजार ८८० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज आहे.

७३,५५० हेक्टरवर होणार तूर लागवड- खरीप हंगामात ७३ हजार ५५० हेक्टर जमिनीवर तूर पिकाची लागवड होणार आहे. आर्वी तालुक्यात १०,७५० हेक्टर, आष्टी तालुक्यात ४ हजार हेक्टर, देवळी तालुक्यात ११ हजार हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १५,५०० हेक्टर, कारंजा तालुक्यात ८,५०० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ८ हजार हेक्टर, सेलू तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टर, तर वर्धा तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर यंदा तुरीची लागवड होणार आहे.

९० मेट्रीक टन खताची राहणार गरज-    विविध पिकांसाठी जिल्ह्याला ९० हजार मेट्रीक टन इतकी खतांची आवश्यकता भासणार आहे. खतांचा पुरवठा करताना आधी तो ग्रामीण भाग व रॅक पॉईंट पासून लांब असणाऱ्या गावांना करण्यात येणार आहे. -    प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे खतांचा पुरवठा न केल्यास किंवा परस्पर पुरवठा कमी जास्त केल्यास वाहतूकदारांवर अत्यावश्यक वस्तु कायाद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे तर त्याच्या पाठोपाठ सोयाबीन पिकाचे क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही गैरसोईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. शिवाय भरारी पथक सज्ज राहणार आहेत.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी, वर्धा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खत कोंडीला सामोरे जावे लागू नये अशा नियोजनाच्या आपण सूचना दिल्या आहेत.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड