शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

पांढरे सोने निकषात बसलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:12 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले.

ठळक मुद्देपीक विम्याचे वास्तव : ८१० नुकसानग्रस्तांना ४२.९४ लाख

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. असे असले तरी विम्याचे कवच घेतलेल्या नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांचे झालेले नुकसान उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषात बसलेच नाही. परिणामी एकाही कपाशी उत्पादकाला झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आर्थिक मदत दिलेली नाही.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला आहे. अशातच प्रत्येक शेतकऱ्याने शेती करताना पीक विम्याचे कवच घ्यावे असे कृषी तज्ज्ञ सांगतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले होते. त्यापैकी उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावर जिल्ह्यातील ८१० नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या नुकसानभरपाई पोटी मिळणाऱ्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम वळती केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या आवाहनाला केंद्रस्थानी ठेऊन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले. सदर शेतकºयांना १६८ कोटी ७७ लाख ९८ हजार ६९७ रुपयांपर्यंच्या नुकसानीचे कवच देण्यात आले होते. हंगामाच्या शेवटी कृषी विभागाच्या सर्वेक्षणाअंती उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषाच्या आधारावर नुकसानग्रस्त ८१० शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यांना एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.व्यक्तिगत नुकसानीचे नऊ अर्जखरीप हंगामात व्यक्तीगत नुकसान झाल्याच्या एकूण ९ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी कृषी विभागाने पंचनामा करून विमा कंपनीकडे पाठविल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अद्यापही निश्चित झाली नसून लवकरच ही आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. यात देवळी व हिंगणघाट येथील नुकसानग्रांचा समावेश आहे.लीड बँकेकडे वळती झाली रक्कमाुकसानग्रस्त ८१० शेतकºयांना नुकसानीपोटी द्यावयाची रक्कम विमा कंपनीने लीड बँकेकडे वळती केली आहे. लीड बँक आता ही रक्कम इतर बँकेकडे वळती करणार असून सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई पोटीची रक्कम टाकली जाणार आहे.रबीत २,२०० शेतकऱ्यांनी घेतले विमा कवचखरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. तर रबी हंगामात २ हजार २०० शेतकºयांनी पीक विम्याचे कवच घेतले होते.उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावरून विमा कंपनीने ८१० शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाईपोटी ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शिवाय ही रक्कम लिड बँकेकडे वळती केली आहे.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :cottonकापूस