शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पांढरे सोने घरी नेण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून सीतदहीला प्रारंभ : पावसामुळे कापूस उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेली बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकºयांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. या बोंडातून कापूस बाहेर येत आहेत. तो शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकºयांकडून सुरू झाले आहे. विदर्भातील शेतकºयांचे प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिल्या जाते. कधी भावाच्या कमी अधिक प्रकारामुळे कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.मागील वर्षी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पऱ्हाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे. कापूस वेचणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकºयांकडून शेतात सीतदही केली जात आहे. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.अशी करतात सीतदहीशेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. हे दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झाडांच्या मध्ये वाकाचा (आंबाडीच्या झाडाची साल) पाळणा बांधून शेतातील पाच गोटे पाण्याने धुऊन ते एका नव्या कापडाचा पाळणा करून टाकण्यात येतात. येथे त्याची पूजा करून तेथे नैवेद्य ठेवण्यात येतो. यानंतर सीतदही झालेल्या परिसरातील कापूस काढून तो एका टोपल्यात गोळा करून तो घरी आणून देवघरात ठेवतात. त्याची पूजा करण्यात येते. यानंतरच कापसाच्या वेचनीला प्रारंभ होतो.

टॅग्स :agricultureशेती