शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठी 'व्हीआर' नंबर आणायचा कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:05 IST

यंत्र आधुनिक; मात्र विकास रस्त्याच्या पुढे सरकेना : सलग सहा वर्षांपासून शेतकऱ्यांची धडपड सुरूच

विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी): चिकणी-निमगाव (सबाने) पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. यासाठी सहा वर्षांचा कालावधी लोटला तरी सात किमी पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही. अधिकारी लोकप्रतिनिधीकडे जावे तर व्हीआर नंबरशिवाय फंड मिळणार नसल्याचे लोकप्रतिनिधीकडून सांगण्यात आल्याने तुम्हीच सांगा साहेब, आम्ही व्हीआर नंबर आणायचा कुठून, असा प्रश्न चिकणी-निमगाव सबाने येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री यांना २७फेब्रुवारी २०१९ला चिकणी येथील शेतकरी प्रवीण भोयर यांनी निवेदन पाठविले होते; पण सहा वर्षाचा कालावधी लोटूनही देवळी-चिकणी-निमगाव या सात किलोमीटर अंतराच्या पांदण रस्त्याला व्हीआर नंबर मिळाला नाही. या पाणंद रस्त्यावर पडेगाव, चिकणी, निमगाव येथील शेकडो एकर शेतजमिनी आहेत. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

सलग सहा वर्षांपासून शेतकऱ्यांची धडपड सुरूचपाणंद रस्त्याला क्रमांक देण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून जि. प. बांधकाम विभागाला दिले. बांधकाम विभाग पुढे अनेक फायली तयार करून वेगवेगळ्या कार्यालयांत पाठवून त्याची अंतिम मंजुरी मंत्रालय मुंबई येथून घेतात. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याकरिता जवळजवळ २ ते ३ वर्षांचा कार्यकाळ लागतो; पण सहा वर्षे उलटूनही ही समस्या सुटली नाही, असे शेतकरी प्रवीण भोयर यांनी सांगतिले.

यंत्र आधुनिक; मात्र विकास रस्त्याच्या पुढे सरकेनाशासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपाययोजनांची मालिका सुरू केलेली आहे. शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतीमध्ये नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. परंतु ती यंत्र शेतात नेण्याकरिता पाणंद रस्त्यांचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही.

लोकप्रतिनिधींचे हात वरपाणंद रस्त्याला क्रमांक पडण्याकरिता कार्यालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. जोपर्यंत पाणंद रस्त्याला क्रमांक मिळत नाही तोपर्यंत त्या पाणंद रस्त्याला खासदार किंवा आमदार फंड मिळत नाही. वर्धा जिल्ह्यात जवळपास २ हजार ३१५ पाणंद रस्ते आहेत. यापैकी बऱ्याच पाणंद रस्त्यांना व्हीआर नंबर नाहीत, यामुळे नदीवरील पूल सोडा साध्या रस्त्याच्या दुरुस्तीलाही फंड मिळणार नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधींकडून हात वर करण्यात आले आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना