शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

चंदेवाणी नदीवरील पूल केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:46 IST

दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : शेती औजारे घेऊन शेतकरी पोहून जातात

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही. दिवाळीपूर्वी या नदीवर पूल बांधल्या गेला नाही. आणि पांदन रस्त्याचे रूंदीकरण व खडीकरण व डांबरीकरण केले नाही. तर आंदोलन करण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. चंदवाणी हे कांरजा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. गावाला लागून एक मोठी नदी आहे. १०० हून अधिक शेतकºयांची शेती नदीपलीकडे सेलगाव शिवारात आहे. ती शेती करण्यासाठी, महिला पुरूष व युवकांना कंबरभर पाण्यातून जीव धोक्यात टाकून जावे लागतात. यापूर्वी नदी ओलांडून जाताना, अपघात झाले आहे. नदीच्या पात्रात दोन्ही बाजूला सिमेंट बंधारे बांधले. असल्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी असते. शेतीची अवजारे सोबत घेवून पोहत जावे लागते. या गावातून विद्यार्थी विद्यार्थिंनी सेलगावच्या माध्यमिक विद्यालयात, शिकायला जातात. पूर असला की, शिक्षण बंद, शाळेला जाता येत नाही.तसेच या गावातून सेलगावकडे जाण्यासाठी पांदन रस्ता आहे. पण या पांदन रस्त्यावर गावातील काही सधन शेतकºयांनी अतिक्रमण करून ४० फुटाची पांदन फक्त १० फुटाची राहिली आहे. या पांदन रस्त्याने बैलबंडी तर सोडा पण पायी सुद्धा सुरक्षित पणे जाता येत नाही. या पांदन रस्त्याच्या अतिक्रमण हटवून खडीकरण, डांबरीकरण व रूंदीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.नदीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूल बांधकाम करण्यात यावे तसेच पांदन रस्त्याचे खडीकरण, रूंदीकरण व डांबरीकरण करावे यासाठी ग्रामपंचायत व गावकºयांनी शासनाकडे मागील वर्षी क्रांतीदिनी तक्रार केली. परंतु त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता संतप्त गावकºयांनी दिवाळीपर्यंतची मुदत शासनाला दिली असून नदीवर, पांदन रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.अनेक गावांची अशीच व्यथाकारंजा तालुक्यातील चंदेवाणी गावातील नागरिक नाल्यातून पोहून मार्ग काढतात. अशीच परिस्थिती पवनार-वाहितपूर गावादरम्यान आहे. येथेही नागरिकांना होडीच्या सहाय्याने मार्ग काढावा लागतो. अनेकदा दुर्घटना घडतात. तेव्हा प्रशासन जागे होते. मात्र या नागरिकांच्या समस्येकडे दुुर्लक्ष कायम केले जात आहे. या गावांना पुल रस्ते देण्यात अपयश आले आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर