शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

चंदेवाणी नदीवरील पूल केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:46 IST

दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : शेती औजारे घेऊन शेतकरी पोहून जातात

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही. दिवाळीपूर्वी या नदीवर पूल बांधल्या गेला नाही. आणि पांदन रस्त्याचे रूंदीकरण व खडीकरण व डांबरीकरण केले नाही. तर आंदोलन करण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. चंदवाणी हे कांरजा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. गावाला लागून एक मोठी नदी आहे. १०० हून अधिक शेतकºयांची शेती नदीपलीकडे सेलगाव शिवारात आहे. ती शेती करण्यासाठी, महिला पुरूष व युवकांना कंबरभर पाण्यातून जीव धोक्यात टाकून जावे लागतात. यापूर्वी नदी ओलांडून जाताना, अपघात झाले आहे. नदीच्या पात्रात दोन्ही बाजूला सिमेंट बंधारे बांधले. असल्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी असते. शेतीची अवजारे सोबत घेवून पोहत जावे लागते. या गावातून विद्यार्थी विद्यार्थिंनी सेलगावच्या माध्यमिक विद्यालयात, शिकायला जातात. पूर असला की, शिक्षण बंद, शाळेला जाता येत नाही.तसेच या गावातून सेलगावकडे जाण्यासाठी पांदन रस्ता आहे. पण या पांदन रस्त्यावर गावातील काही सधन शेतकºयांनी अतिक्रमण करून ४० फुटाची पांदन फक्त १० फुटाची राहिली आहे. या पांदन रस्त्याने बैलबंडी तर सोडा पण पायी सुद्धा सुरक्षित पणे जाता येत नाही. या पांदन रस्त्याच्या अतिक्रमण हटवून खडीकरण, डांबरीकरण व रूंदीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.नदीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूल बांधकाम करण्यात यावे तसेच पांदन रस्त्याचे खडीकरण, रूंदीकरण व डांबरीकरण करावे यासाठी ग्रामपंचायत व गावकºयांनी शासनाकडे मागील वर्षी क्रांतीदिनी तक्रार केली. परंतु त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता संतप्त गावकºयांनी दिवाळीपर्यंतची मुदत शासनाला दिली असून नदीवर, पांदन रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.अनेक गावांची अशीच व्यथाकारंजा तालुक्यातील चंदेवाणी गावातील नागरिक नाल्यातून पोहून मार्ग काढतात. अशीच परिस्थिती पवनार-वाहितपूर गावादरम्यान आहे. येथेही नागरिकांना होडीच्या सहाय्याने मार्ग काढावा लागतो. अनेकदा दुर्घटना घडतात. तेव्हा प्रशासन जागे होते. मात्र या नागरिकांच्या समस्येकडे दुुर्लक्ष कायम केले जात आहे. या गावांना पुल रस्ते देण्यात अपयश आले आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर