शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

लोकशाहिरांच्या स्मारकाचा मुहूर्त कधी?

By admin | Updated: November 16, 2016 00:52 IST

समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे तथा आपल्या प्रभावी लेखनीतून समाजभान जागृत करणारे, दुर्बल घटकांसाठी साहित्य व कर्तृत्वातून

शासनाकडून दुर्लक्ष : मातंग समाजबांधवांचा आरोपआष्टी (शहीद) : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे तथा आपल्या प्रभावी लेखनीतून समाजभान जागृत करणारे, दुर्बल घटकांसाठी साहित्य व कर्तृत्वातून आवाज उठविणारे थोर थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दरवर्षी हार घालून जयंती साजरी केल्या जाते. मात्र त्यांच्या स्मारक निर्मितीकरिता शासनाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. अनेक वर्षापासून येथे संरक्षण भिंत नाही. सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा आहे. यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाज बांधवांनी लोकशाहीरांच्या स्मारकाचा मुहुर्त कधी अशी विचारणा शासनाकडे केली आहे. अण्णाभाऊ साठे हे नाव जनमानसात लोकप्रिय आहे. तत्कालीन मागासलेल्या समाजाची व अस्पृश्यांच्या व्यथा फकीरा या कादंबरीमधून त्यांनी मांडली. फकीरा प्रभावीपणे उभा केला मात्र आज त्याच लोकशाहीराला उन, वारा, पाऊस या तिन्हीचा सामना करावा लागत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हक्काचे संरक्षण नसावे ही प्रशासनातील आंधळेपणाची बाब ठरत आहे. राज्यमार्गाला लागून असलेल्या प्रशस्त जागेवर काही वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. वर्षभरात येथे दोनदा कार्यक्रम आयोजित केल्या जातो. जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाला मातंग समाज बांधवांसह पुढारी येतात. आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र पुढील कार्यवाही होत नाही. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यासाठी पुढाकाराची गजर व्यक्त होत आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या भोवती असलेले तारांचे कुंपण तुटले आहे. लोखंडी गेट चोरीला गेले, परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. येथे विकासकामाची गरज आहे. मानवतेच्या महामानवाला समस्यांच्या गर्गेतून बाहेर काढा अन्यथा आंदोलक पवित्रा घेऊ अशा प्रतिक्रीया मातंग समाजबांधवांनी व्यक्त केल्या.(तालुका प्रतिनिधी)